Wednesday, November 5, 2014

नॉस्टॅल्जिया

एक प्रचंड उर्मी मनात दाटुन येते आणि तडक मिळेल ती फ्लाइट पकडावी आणि "घर" गाठावं असं वाटतं. हिवाळा आला की माझं असं होतं.
एसीच्या कृत्रिम थंड हवेत ते पुण्यातल्या हवेतल्या गारव्याचं सुख नाहीच. माणुस आहे त्यात कधीच सुखी नसतो, तो आपल्या भुतकाळातला सुगीचा काळ आठवून खुश होत राहतो. हिवाळा आला की माझं असं होतं.
मस्त पैकी नोवेंबर डिसेंबरातली कडाक्याच्या थंडीतली पहाट असते. बंब पेटवायचा, गरम पाणी तापलं की ऊघड्यावरच अंघोळ करायची. मॉइश्चरायझर्स किंवा स्किन लोशन्स असला काही प्रकार नसतो, एकच प्याराशुटचं तेल डोक्यापासुन पायापर्यंत चोपडायचं असतं. तेही थंडीने थिजलेलं असतं. मजबूत नाश्ता करून थेट गावाबाहेरच्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळायला पळायचं असतं. कसलीच टेन्शन नसतात की डेडलाईन्स. थंडीत कोणालाच विकेटकिपर थांबायचं नसतं. ऊन चढलं तरी हवेत प्रचंड सुखद गारवा असतो. स्वेटर आणि माकडटोपी घालुनही छान थंडी वाजत असते. शेतात शाडु सुर्यफुल वगेैरे डौलाने डोलत असतो. बॉल शेतात गेला की पळत जायचं. सकाळीच पिकाला पाणी दिलेलं असतं, त्या मातीत पाय रुततात. गारगार चिखलात चप्पल आडकली की परत पाटाच्या पाण्यात पाय धुवायचे.. तिथेच पाणी प्यायचं ..परत क्रिकेट. मधेच कॉन्ग्रेस उपटून ती पिवळी फुलपाखरं पकडायला त्यांच्यामागं धावावं. हिवाळा आला की माझं असं होतं.
कुडकुडत्या पहाटे लवकर उठायचं. डबल ज्याकेट ग्लोवज घालुन रेडी व्हायचं. मित्रांच्याही काही कमिटमेंट नसतात.सगळे पडीक हवे तेंव्हा हवे तिथे जायला तयार असत. तोंडातुन वाफा निघतात. त्यात बळेच स्मोक केल्याचं फिलींग घायचं. सगळ्यांनी एकसाथ बाईकला किका मारून कोकण महाबळेश्वर किंवा भिमाशंकरला कुच करायचं. वाटेत भेळ वडापाव आणि च्या सनकून हाणायचा. फुल कल्ला करायचा.. थंडीत याची मजाच न्यारी. हिवाळा आला की माझं असं होतं.
सकाळीच गर्लफ्रेंडला फोन करायचा. लोणावळ्यात भेटायचं. कुठेतरी चोपुन नाश्ता करून सरळ अँबी व्यालीच्या दिशेने सुटायचं. गारवा आणि ऊब एकसाथ अनुभवायची. हिवाळ्यातला लोणावळा पावसाळ्यातल्या पेक्षा बेष्ट. एकांत.. षांतता.. गारवा.. आणि प्रचंड अतुरता. हिवाळा आला की माझं असं होतं.
साला हिवाळ्यात पुणे ही जगातली बेष्टेष्ट जागा आहे. वाटतं मिळेल ती फ्लाइट पकडावी आणि "घर" गाठावं.

Tuesday, September 16, 2014

पैसा झाला छोटा


आमच्या मातोश्री म्हणजे कडक ! बाहेरचे खाणे , फुकटचे लाड , बाहेर गेल्यावर वचवच करणे , नातेवाईकांकडे गेल्यावर कोणाच्याही वस्तूला हात लावणे किंवा वस्तू घेणे इत्यादी गोष्टींची आम्हाला जबरदस्त जरब होती. आईने डोळे मोठे केले की आम्ही दबकून गप्प बसत असू. कधी मधी पाहुणे घरी आले आणि त्यांनी रुपया जरी हातावर ठेवला तरी आम्ही तो आज्ञाधारकपणे आईच्या हाती देत असू. पन्नास वेळा विनवण्या केल्यावर कधी चाराणे मिळत. त्यातून मग पेरू खावा की बर्फाचा गोळा खावा की पेप्सीकोला घ्यावा की गुलाबजाम ( त्यावेळी सुक्के गुलाबजाम गोळ्याबिस्किटांच्या दुकानात मिळत ,नेहमीच्या गुलाबजामशी त्याचा संबंध नाही ) यात माझे कन्फ्युजन होत असे. आईने पॉन्डस च्या मोठ्या डब्याला एक आडवा छेद देऊन त्याचा गल्ला बनवला होता. त्यात आई तिच्या शिवणकामातले पैसे काढून थोडेफार त्यात टाकत असे. मी काहीतरी आयडिया करून त्यातल्या कॉइन्स काढण्याची शक्कल काढली होती. एकदा हे भांडे फुटल्यावर चंपी झाली आणि नंतर आईने प्रोपर गल्ला आणला.

थोडासा मोठा झाल्यावर म्हणजे हायस्कूलला गेल्यावर कधी मधी आई हातावर पाच दहा रुपये टेकवत असे. वडील तसे दिलदार , त्यांना पैसे मागितले की "घे खिशातून" म्हणत . "घे खिशातून" हा त्यांचा पेटंट डायलॉग. पैशाचं कधी काय केलं काय नाही असले प्रश्न त्यांनी कधी विचारले नाहीत. आम्ही मात्र आईच्या धाकाने पैसे मागायला कचरत असू. कधी एकठ्ठे सहा रुपये मिळत तर कधी एक दोन रुपये जमवून मी सहाचा आकडा जमवत असे. सहा रुपयांचा हिशेब १ सुक्की भेळ किंवा २ वडापाव किंवा २ सामोसे किंवा पाणीपुरी असा हिशेब होता. त्यातही त्या पैशाचे काय खाऊ काय नको असे होत असे.

कॉलेजात गेल्यावर डेली वीस रुपये पॉकेटमनी मिळू लागला. याचाही हिषेब पक्का होता. १० रुपये बसचे रिटर्न आणि ६ रुपये रेल्वेचे रिटर्न तिकीट. ४ रुपये खाऊसाठी. त्यात मी बऱ्याचदा रेल्वेचं तिकीट काढत नसे. एक दोनदा टीसीने पकडलेही होते, पण तोवर मी इतका मोठा झालो होतो की एकट्या टीसीला पकडणे शक्य झाले नाही. एके दिवशी दोन टीसीनी पकडले तेंव्हा तब्बल ८५ रुपये द्यावे लागले होते. सुदैवाने खिशात एक शंभराची नोट आडीनडीला वडिलांनी देऊन ठेवली होती. असो, तर कॉलेजातही आम्हाला काही पैशाची फार चंगळ भेटली असे नाही.फायनल इयर ला येई पर्यंत विसाचे पन्नास झाले होते. इयत्ता पहिली ते इंजिनियरिंगचे फायनल इयर हा प्रवास माझ्या पैशाने चाराण्यापासून सुरु केला तो पन्नास पर्यंत.

आता पर्यंत प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी मी आई वडिलांकडे पैसे मागायचो. ट्रीपला जायचंय, बाईक हवी , पेट्रोल भरायचंय , कपडे हवेत , जीन्सच घ्यायची , सायकल हवी , पार्टीला जायचंय, मित्राकडे फिरायला चाललोय , लग्नाला चाललोय, इथपासून सायबर कॅफेमध्ये जायचंय , मोबाईल घ्यायचाय , रिचार्ज करायचंय ... इंटरव्यूला चाललोय , सीवी च्या प्रिंट काढायच्यात , भाड्याला पैसे ... सगळीकडे मी डीमांडिंग होतो. त्यांनी कधी सढळ हाताने पैसे दिले नाहीत , पण कधी मनही मारू दिलं नाही. हवं ते कधी ना कधी मिळायचंच. आतापर्यंत मी केवळ परावलंबी होतो. तेंव्हा स्वत: पैसा कमवला तर किती मजा येईल , कोणालाही मागावे लागणार नाहीत , खिशात नुसती खुळखुळ. पाकीट फुगलेलं तेंव्हा असे , पण त्यात नोटा दोनेक आणि बाकीची फालतू रद्दी जास्त असे. त्यात आता नुसत्या नोटा येतील , मग मी आई वडिलांना पैसे देत जाईल . ते माझ्याकडे पैसे मागतील.. नक्की आठवत नाही , पण याच काहीतरी प्रकारचा विचार मी तेंव्हा करत असायचो .
नोकरी लागल्यावर मला कंपनीतच ICICI च्या एजंटने अकाउंट ओपन करून दिलं , कार्ड देऊन गेला. ते भारी वाटलं. ICICI च्या ATM मधून तेंव्हा नेहमी १००च्या करकरीत नोटा निघायच्या. मी कायम पाकीट भरलेलं ठेवायचो. खाण्या-पिण्यात आपण कधीही हातचा राखला नाही स्वत:चे सगळे लाड पुरvवले . असो .

आज आईचं फोन बिल भरताना अचानक आठवण आली. किती दिवस झाले पैशाचा ओघ उलटा सुरु झाला . चारणे आठाणे तर आता चलनातही नाहीत... पण आईला कुठे जायचं असलं की , कपडे घ्यायचे , दागिना हवा ... म्हणेल ते .. आपसूक पैसा जातो. अगदी नकळत. त्या पैशाची फिगर आता हजार पटींनी वाढली . पण तेंव्हाचाच पैसा मोठा होता .
पैसा छोटाच झाला .

Sunday, September 14, 2014

गुंठामंत्र्यांची ग्रोथ


फार्फार वर्षांपुर्वी..(म्हंजे २००० च्या पुर्वी) पुण्यात गुंठ्याला जास्त भाव नव्हता.. आणि जास्त भारीभारी गाड्याही आपल्या मार्केट मधे नव्हत्या. तेंव्हा गुंठामंत्री जीबडं (कमांडर वगैरै) घेत.
मधल्या काळात गुंठ्याला भाव येऊ लागला. महींद्रा अपग्रेड झाला. आणि गुंठामंत्री 'कॉर्पियो' ऊडवू लागले.
पवार सायबांच्या धोरणाने गुंठामंत्र्यांना अजुन भाव आला.. मग आली फॉर्चुनर.
आणि गेल्या २-३ वर्षांतला धिंगाणा तर विचारूच नका. गुंठ्याचे भाव गगणाला आणि पायलीच्या ५० पॉश गाड्या दिमतीला.
आता गुंठामंत्री आवडी (ऑडी) ए४, क्युशेवन, बीयमडब्लु, जाग्वार... रेंज रोवर उडवायला लागले.
या गतीने आगामी ५ वर्षांत पुण्यात फेरारी, मक्लरेन, लँबोर्गीनी बुगाटी, क्याडील्याक वगैरे गाड्या पुण्याच्या रोडवर दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
पांढरी शुभ्र लँबो किंवा फेरारी हिंजवडीच्या 'शिग्नल'ला ऊभी आहे. आत मिररला ते राष्ट्रवादीचं मानचिन्ह लटकत आहे, गाडीच्या विंडशील्ड वर "आबांची कृपा" "..."फक्त भाईच्" वगैरेचा रेडीयम आर्ट केला आहे, मागच्या काचेवर शिवशेना किंवा कमळ किंवा पंजा किंवा घड्याळाचा वॉटरमार्क काढला आहे. आतमधे १० रेड्यांची गुर्मी असलेलं काळा रेब्यान विथ गोल्डन फ्रेम घातलेलं व्यक्तिमत्व बसलेलं आहे .. काच खाली करून भाई लिटरभर पान खाऊन पिंक टाकत आहे ... आहाहा विंहंगंमंगं दृश्य
मग आपण हळूच म्हणायचं .. "जिमीन विकली बापाची ... गाडी घेतली फेरारीची ",  "बघतोस काय रागानी ... गाडी घेतलीय ल्याम्बोर्गिनी "

Sunday, September 7, 2014

Untitled

स्टेटसला नक्की काय टायटल देऊ सुचत नाही !

फार्फार वर्षांपूर्वी कॉलेजात असताना इ-स्क्वेयर (गणेश खिंड)  लै भारी वाटायचं. मुव्ही पहायची म्हटलं की ई-स्क्वेयर ठरलेला असायचा. नेहमीच पैशाचा जुगाड होणे अवघड , त्यामुळे सकाळी ८ चा शो फारच स्वस्तात पडतो म्हणून अर्धी झोप टाकून पिक्चर पाहायला अस्मादिक सकाळी ७लाच  निघत. तेंव्हा मल्टीप्लेक्सचं अप्रूप फार. सिंगल स्क्रीन थेटरातल्या अत्यंत हलक्या क्वालिटीच्या तिकीटासमोर ते प्रिंट केलेलं तिकीटही भाव खाऊन जायचं. नुसत्या सिनेम्यासोबत खायची प्यायची सोय , थोडासा शॉपिंगचा ऑप्शन आणि फुकटात एसी खात पुस्तके चाळायची सोय क्रॉसवर्डात व्हायची.  म्हणून इस्क्वेयर नेहमीच फेवरिट. हिरवळ वगैरे बोनस. त्यावेळी  कॅम्पातले आयनॉक्स म्हणजे माज वाटे. :) तिथे मी अग्नीवर्षा सोडला तर आयुष्यात दुसरा पिक्चर पाहिला नाही. नंतर नंतर सिंगलस्क्रीन थेटर  फारच बोगस वाटू लागली. ते थेटरात पिक्चर पाहणे डाऊनमार्केट वाटे.  अलका, अलंकार , राहुल , डेक्कन , वेस्टएंड , लक्ष्मीनारायण , विशाल वगैरे सिंगलस्क्रीन मल्टीप्लेक्सच्या झपाट्यात पारच कोमेजली.  मराठी सिनेमाला चोइस नसल्याने तो आपला प्रभातात दिसायचा. जायचो तिथेही. त्यात काही काळाच्या ओघात मल्टीप्लेक्स झाली ती तरली. बाल्कनी आणि स्टोल असायचा. बाल्कनीचं तिकीट काढलं की भारी वाटे. आता रो-वाईज तिकिटं घ्यायची :) लग्नापूर्वी कोपऱ्यातली जागा शोधत असू. आता काय सेंटर हवे ,व्यवस्थित चित्रपट दिसायला हवा.
काळाच्या ओघात मॉल वाढले, मॉल सोबतच स्क्रीन्स आल्या. चिक्कार ऑप्शन. आता इ-स्क्वेयर अगदीच सामान्य वाटते. पण तरीही , इ-स्क्वेयरच्या बऱ्याच आठवणी आहेत. नोकरीला लागल्यावर लेटनाईट मुव्ही पाहून बाईकवर कुडकुडत रात्री स्टेशनला बेकरीतला प्याटीस खाणे , किंवा मग ऑप्शनच नाही म्हणून कमसम ला कोंबडी तुडवणे...  कधीही कुठेही खाण्यापिण्याची आणि घुमणेफिरणे , मनाला येईल तेंव्हा ब्याकटूब्याक ३-३ सिनेमे पाहणे ... यातच अच्छे दिन होते.

भांचोत लाईफस्टाईल सुखवस्तू झाली पण ते शेंशेषण हरवलंय !  फार लांबची गोष्ट नाही हो.. आत्ताआत्ता साताठ दहा वर्षापूर्वीपर्यंत होतं .. सगळं इथेच तर होतं !

Sunday, August 31, 2014

बॉलीवूड फंडा : ( इंडायरेक्ट रेफरन्स वाली गाणी )



बॉलीवूड चित्रपटांत बरेच फंडे फारच ठरलेले असतात.पूर्वीच्या काळी व्हिलन हिरोच्या लहानपणी त्याच्या मात्या-पित्याचा खून करणार मग हिरो मोठा होऊन त्याचा बदला घेणार. त्यातही कहाणी में ट्वीस्ट म्हणून हिरोईन कधी विलन च्या बाजूने होणार तर तिला अचानक काहीतरी गुपित माहिती होणार ज्यात व्हिलनच तिचा खरा व्हिलन आहे हे कळणार , मग ती हिरोला मदत करणार. त्यातही हे परत व्हिलन ला कळणार मग तो हिरोईनच्या आईला किडन्याप करून एका खांबाला बांधून ठेवणार.  ८०-९० चे दशक हे बॉलीवूड मध्ये "बदला दशक" म्हणायला हरकत नाही. यात गुंडा सारखा अप्रतिम बदलापट आपण पाहिला. चित्रपटात जर "पाप रणजीत" सारखे महानुभाव असतील तर हिरोच्या बहिणीवर एखादा अतिप्रसंग फिक्स. किंवा मग एक फ्यामिली मेलोड्रामा. बिंदू, कादर खान , बाबूजी अलोक नाथ , अजित वाच्छानी , रीमा लागू , मोहनीश बैल , अर्चना पुरणमासी , अनुपमखेर वगैरे मंडळींनी त्याकाळी हे रोल करून खूप छपाई केली. पण अलीकडे हे फंडे आउटडेटेड झाले. कालानुरूप त्यात बरेच बदल होत गेले.  पण एक फंडा अजूनही चालूच आहे आणि तो अनंतापर्यंत चालूच राहील...

गाणी बॉलीवूडचा आत्मा. ज्या चित्रपटांत प्रेमाचा त्रिकोण असतो , त्या चित्रपटांत एखाद दुसरं गानं इंडायरेक्ट रेफरन्स वालं असतंच असतं. यात १ हिरो २ हिर्विन्स किंवा २ हिरो एक हिर्विंस  किंवा २ हिरो २ हिर्विन्स इन क्रॉसलिंक  या प्रकारात बऱ्याचदा  हिरो हिर्वीनचे जुणे किंवा छुपे संबंध असतात, पण काही ट्रेजीडी मुळे कनेक्शन व्यवस्थित बसलेलं नसतं. वायरमनच्या भाषेत  अर्थिगला पाझीटिव्ह वायर लावल्यासारखं काहीतरी. तर हे सांगायचे कसे ? त्यांची कुचंबना सांगायची कशी ? मग त्यासाठी गाणी अल्टीमेट प्ल्याटफॉर्म असतो.  कृष्णधवल जमान्यापासून चालत आलेला हा फंडा अलीकडेच आलेल्या स्टुडेंट ऑफ द इयर सारख्या चित्रपटातही पाहायला मिळतो.  अगदीच निवडक काजू वेचायचे म्हटले तर काही गाणी चटकन समोर येतात ..
दिल के झरोके
क्या हुवा तेरा वादा .. वो कसम वो इरादा  ( हम किसी से कम नही )
तू प्यार  है किसी और का तुझे चाहता कोई और है ( दिल है के मानता नही )
मेहँदी लगा के रखना डोली सजा के रखना ( DDLJ )
सांवलीसी एक लड़की ... ( मुझसे दोस्ती करोगे )
..
चिक्कार गाणी आहेत. सांगायचा मुद्दा असा , या गाण्यांच्या वेळी सगळी सच्चाई  ओरीगिनल हिरो , हिर्वीन आणि प्रेक्षक यांनाच माहित असते , तो कबाबमें हड्डी या प्रकरणापासून अंजान असतो. आणि एवढी स्पष्ट रेफरन्स देऊन केलेली गाणी , हातवारे , या दोघांचे एक्स्प्रेशन इत्यादी पाहून त्यात आता लपवण्यासारखे काही नाही असे होते. हा सूर्य हा जयंद्रथ इतकी परिस्थिती झाल्यावर प्रेक्षकांचा मानसिक चोळामोळा होतो . आता हे भांडे फुटल्यावर पुढे काय होणार म्हणून बऱ्याच प्रेक्षकांच्या ब्ल्याडर वर ताण येतो... थोडेसे  बेचैन होते , पण या सगळ्यात ते "कबाब में हड्डी" क्यारेक्टरला याचा थांग पत्ताही लागत नाही ..  किडन्यापिंग , रेप , खून , बदला , अदलाबदली वाले फंडे कालबाह्य झाले .. पण  गाण्यांचा हा फंडा अनंतापर्यंत चालणार ..

खास हे फंडू गाणे :

http://www.youtube.com/watch?v=7GS5QXBHsfU

Saturday, August 23, 2014

भारतातली "चायनिस" खाद्यसंस्कृती

 मला आठवतं त्यानुसार जवळपास २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात 'चायनीस' खाद्यसंस्कृतीचा उदय झाला. या "चायनिस" खाद्यपदार्थांचा खरोखर चायना मध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांशी काडीचाही संबंध नाही हे आधीच नमूद करावे लागेल. असला तर तो फक्त "राईस" आणि "नुडल्स" चा .एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चायनीसच्या टपऱ्या लागायला सुरुवात झाली. एकीकडे म्याकडोनाल्ड डॉमिनोज पिझ्झा हट सारखे अमेरिकन युरोपियन मल्टीन्याशनल ब्रांडस् उच्चभ्रू संस्कृतीत पॉप्युलर होत असताना "चायनिस" ब्रांड मध्यमवर्ग आणि खालच्या वर्गात रुजत होता.
चायनिस ची गाडी टाकण्यासाठी काय लागते ?
१. एक टिपिकल डार्क लाल रंगाची ६x4 फुटाची टपरी.
२. त्यावर एक ड्रागन पेंट केलेला .(या ड्रागनचे वैशिष्ठ्य असे की एकवेळ दोन फिंगरप्रिंट्स म्याच होतील पण एका टपरीवरचा ड्रागन दुसऱ्या टपरीवरच्या ड्रागन शी कधीही म्याच होत नाही ) काही टपर्यांवर तर मगरी ,पाली सुसरी, डायनासोर, गॉडजीला , एनाकोंडा ही काढलेले मी पहिल्या आहेत.
३. एक चीनी दिसणारा नेपाळी/ मणिपुरी /ओरिसी/हिमाचलपरदेशी किंवा कुठलाही पूर्वेकडील कुक. असा कुक नसेल तर ते चायनिस चालत नाही असा अनुभव आहे.
४. नाव : हॉंगकॉंग , शांगाय , बीजिंग/बेजिंग , ब्ल्याक ड्रागन , सोल्टी. घुमुन फिरून १० प्रकारची नावच मी पहिली आहेत. आमच्या इथे एक चम्पा चायनिस पण होतं. पण ती फारच एक्सेप्शनल केस होती. नाव जर चायनीज नसेल तर चायनिस चा फील येत नाही .
५. २ मोठ्या कढया , एक लांब दांडा असलेली मेगा पळी भला मोठा ग्यास बर्नर एवढ्या सामुग्रीत कोणताही चायनिस पदार्थ बनतो
६. नीलकमल प्लास्टिक फर्निचर. या नीलकमलवाल्याचा बिजनेस वाढला तो चायनिस टपरीमुलेच .
६. ल्यामिनेट केलेलं मेनुकार्ड. हे जास्तीत जास्त १ पानाचे असते. मराठी आणि इंग्रजी ऑप्शन दिल्यास ते २ पानी होते. त्यातल्या मराठी आणि इंग्रजी स्पेलिंग घटकाभर मनोरंजन व्हावे म्हणून मुद्दाम तशा छापलेल्या असतात
हा सगळा हार्डवेयर सेटअप झाला की चायनिसची हातगाडी धंद्याला तयार असते. दुपारचे चार वाजले की कुठल्याही रोडसाईडला गाडी लावून द्यायची. चायनिसवर जे ट्रेनी किंवा नवीन रुजू होतात त्यांना कोबी कापायचे काम दिले जाते. धंद्याला सुरुवात होण्यापूर्वी ट्रेनी पोरगं पोतंभर कोबी कापून रेडी करतं. सिनियर चायनिस कुक दुसरीकडे चिकनचे पीस साफ करणे, लॉलीपॉपच्या कांड्या तयार करणे , नुडल्स आणि चिकन लाल रंगाच्या मसाल्यात डीपफ्राय करणे वगैरे कामं करत असतो. आणिक एक पोऱ्या प्लास्टिकचे टेबल आणि खुर्च्या लावत असतो. प्रत्येक टेबल वर तीन वाट्या असतात. यात टोमेटो-चिली -सोया सॉस असतो. डेली रुटीन सेम असते. पब्लिक यायला सुरुवात झाली की चायनिस कुक ग्यासचा जाळ मोठा करून त्यावर ती कढई ठेवतो. त्यात पाणी मारून एका छोट्या खराट्याने ती साफ करून कढई उलटी करतो. मग ऑर्डर असेल त्या प्रमाणे त्याच कढाई मध्ये पदार्थ बनवले जातात. एका हाताने ती कढाई आणि एका हाताने तो लांब दांड्याची मेगापळी यांना एकमेकांवर आपटत अल्मोस्ट सगळे पदार्थ तयार होतात.
आपल्याकडे चायनिस फार थोड्या काळात फार लवकर पॉप्युलर झालं. स्वस्त आणि कमी भांडवलात चालू कमाईचा बिजनेस म्हणून चायनिस टपरीचा उदय झाला. गावातल्या छोट्यामोठ्या भाई लोकांनी या उद्योगात भलताच इंटरेस्ट घेतल्याने गल्ली बोळात चायनिस खाद्यसंस्कृती पसरली. बेवड्या लोकांना विदाउट सर्विसचार्ज दारू पिण्याची सोय या निमित्ताने झाली. पोलीस लोक हप्तावसुलीच्या निमित्ताने येतात तेंव्हा जेवणाचीही फुकट ऑर्डर देतात त्यांच्यासाठी खास उरलेल्या खरकट्या अन्नातून एक "पोलीस राईस" बनवला जातो. जे बेवडे पिऊन टाईट असतात त्यांना चिकनच्या नावावर डाळीचे लॉलीपॉप खाऊ घातले जातात. हायजीन वगैरे गोष्टीची चिंता करू नये. चिकन लॉलीपॉप, चिकन फ्राईड राईस , ट्रिपल राईस , लंग फंग सुप, मंचाव सूप , इत्यादी ऑर्डर द्यावी. मनसोक्त हाणावे.
मोठ्या हॉटेलांत पण चायनीज पदार्थ मिळतात. मेनल्यांड चायना सारखी ऑथेंटिक चायनीज रेस्तरा आपल्या कडे आहेत. पण मी जेंव्हा हॉंगकॉंग मध्ये गेलो आणि तिथले ओरिजिनल चायनीज पदार्थ पाहिले तेंव्हा मी चाट पडलो. आपल्या इथल्या चायनीस चा आणि ओरिजिनल चायनीजचा काहीही संबंध नाही . इव्हन लंगफंग सूप , मंचाव सूप , शेजवान राईस /नुडल्स असले कुठलेही पदार्थ मला तिकडे सापडले नाहीत . लॉलीपॉप नावाचा पदार्थ तिकडे अस्तित्वातच नाही. हॉंगकॉंगमध्ये त्याला चिकन विंग्स किंवा ड्रमस्टिक्स म्हणतात आणि ते बनवायची स्टाईल ही लॉलीपॉपच्या जवळपासही नाही.नाही म्हणायला सोया , विनेगर , चिली सॉस वगैरे वापरतात. नुडल्स आणि राईसही पूर्ण वेगळे असतात. आपल्याला ते चायनीज आवडणारही नाही.. त्याच हेतूने इंडियामेड फेक चायनीजची (ज्याला वर "चायनिस" म्हटले आहे.) निर्मिती झाली असावी .
कॉलेजात असताना चायनिसचा चस्का लागला होता. अल्मोस्ट रोज चिकन तोडायला मी चायनिसच्या टपरीवर पळायचो. बरेच दिवस लिहिणे मनात होते. हा नोस्तेल्जीया आहे.आता चायनिस तितकेसे रुचत नाही. टपरीवर खायला संकोच वाटतो. चायनिस चा बिजनेस आता आपल्याकडे सेट आहे .

लई भारी - एक लई भंगार अनुभव

लई भारी - एक लई भंगार अनुभव
एके दिवशी काय जाहाले ..
एके दिवशी काय जाहले ..
मी बसलो होतो टोरंट शोधात आणि लई भारी चा टोरंट सापडला
आणि माझ्याच हाताने माझ्या पायावर धोंडा पडला
असो, तर चित्रपटाचं संगीत महाराष्ट्राच्या ढोल-ताशाने (अजय अतुल) दिलेलं असल्यामुळे सुरुवातीपासून धात्ताड-तत्त्ताड वाजायला सुरुवात होते आणि पुढच्या दोन तास आता फक्त नाशिक ढोल ऐकायचा आहे अशी पाल चुकचुकते. फेटा घातलेले एक लोकल बडी असामी म्हणजे प्रतापसिंह निंबाळकर , आणि त्यांच्या सौ सुमित्रादेवी आपल्या कुलदैवताच्या मंदिराच्या रिनोवेशनसाठी एखादा नेता आपल्या समर्थकांना अभिवादन करावे तसे येत असतात. तोच , एक शमनछाप भटजी मध्ये शिंकतो, आणि या निपुत्रिक बाई ला मंदिरात प्रवेश नको म्हणून ढूस्की सोडतो. यावरून कळते की यांना मुल नाही. तोच त्याला कोणी "२ रुपयाचा भटजी" म्हणून जागा दाखवतो पण प्रतापसिंह हा निर्णय "रिवाज" म्हणून मान्य करतो. (आता मंदिराचा जीर्णोद्धार होण्या आधी हा रिवाज होता का ? या आधी मंदिरात वांझ बाई चालत नाही म्हणून माहित होतं तर एवढं शॉक होण्याचं कारण काय ? वगैरे मनाला पडू नयेत) ब्याक ग्राउंड ला अजय अतुल वाजत राहतो. हा प्रसंग झाल्यामुळे मासाहेब दुखी होतात , घरकाम करणाऱ्या बाई त्यांना वारी ला जाण्याचे सुचवतात. पण थोड्यावेळापूर्वी कसलीतरी फालतू रीत मानणारे प्रतापसिंह रागावतील म्हणून बाई मी कशी येऊ म्हणून प्रश्न उपस्थित करतात. त्यावर मोलकरीण मासाहेबांना "वाक" ला येण्याचे निमित्त करायला सांगतात. मा साहेब वारीत घुसतात. अजय अतुल वाजत असतो. थोड्यावेळाने पंढरपूरच्या पोचून विठोबा मंदिरात मासाहेब बच्चनस्टाईलमध्ये विठोबाला दोष देतात, दोष देऊन शांत झाल्या की पदरात मुल घालण्याची याचना करतात , त्या एवढ्या हतबल झालेल्या असतात की म्हणतात "मला फक्त एकदाच आई कर आणि पाहिलं मुल मी तुला अर्पण करीन". म्हणजे त्यांना पुत्र तसा नकोच असतो , फक्त तो वांझ वाला कलंक नको असतो. वारीवरून घरी आल्यावर मासाहेबांना तत्काळ कोरड्या उलट्या सुरु होतात. त्यावरून त्यांना कळते की आपल्याला मुल होणार आहे. प्रतापसिंह जाम खुश होतात. मोलकरीण मासाहेबांना आपल्या नवसाची आठवण करून देतात. मासाहेब हे प्रतापसिंहाला सांगतात. प्रतापसिंह संतापतात पण त्यांचा संताप सात्विक असतो. ते समजावतात की मुल नवसामुळे नाही तर डॉक्टरने ( की ज्योतिषी? ) संगीलेलं असतं की "तुम्हाला मुल लेट होणार" त्यामुळे झालेलं आहे. ते त्यांचा सगळा बिजनेस आणि गाव सोडून लंडनला निघून जातात. ( येथे उल्लेख करावा लागेल तो प्रतापसिंहाच्या घराचा. घर एकविसाव्या शतकातल्या लेटेस्ट डिजाईनचं असतं , पण त्यांची कार जुना काळ दाखवायचा म्हणून देवानंदच्या पिक्चर मधली असते )
मासाहेबांना जुळी मुलं होणार आहे हे त्यांना आणि त्यांच्या डॉक्टरांना डीलेवरी होईपर्यंत कळत नाही. मुल झाल्यावर दुसऱ्याच एकामुलाची रवानगी पंढरपूरला होते. डॉक्टर कडून गोपनीयतेची शपथ घेऊन ही बातमी लपवली जाते. एक मुलगा ( प्रिन्स ) आपणच ठेवून घेतात आणि आपल्याला पुत्र झाला आहे हे मासाहेब लंडनला फोन करून कळवतात, प्रतापसिंह लगेच झालं गेलं विसरून परत येतात. अजय अतुल वाजत राहतो. मुल मोठं होतं. मधल्या काळात प्रतापसिंहाचा भाऊ आणि त्याचा मुलगा संग्राम साउथ स्टाईल आतंक माजवत असतात. मनाला येईल तेंव्हा हवे त्याला आडवे करत असतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असतात. प्रतापसिंह वैतागून यांना धडा शिकवायचा ठरवतो तेंव्हा काका-पुतण्या त्याला कायमचे आडवे करतात. परदेशातून शिकून आलेला प्रिन्स अगदीच झाम्या असतो. नाकावरची माशी उठत नसते. तो एका आयटमच्या प्रेमात पडतो. ती आयटम संग्रामने प्लेस केलेला सापळा असतो. प्रिन्सकडून ती सगळ्या जायदादच्या कागदावर सह्या घेते आणि मग संग्राम एका ट्रक ने प्रिन्स चा खेळ खल्लास करतो
आता मा साहेब एकट्याच असतात. संग्राम त्यांना बेइज्जत करून हाकलतो तेंव्हा त्या फारच डाऊन होतात. पंढरपूरला जातात. तिथे "तंटा नाय तर घंटा नाय" म्हणत घंट्यासाठी फायटिंग करणारा माउली उर्फ 'विठ्ठलाला अर्पण केलेला पुत्र' भेटतो.विठ्ठलाच्या पायाखाली वीट असते म्हणून माउलीने वीटभट्टी टाकलेली असते. दिवसा वीटभट्टी आणि रात्री हातभट्टी असा त्याचा रुटीन असतो . त्याला थोडे हेड्सअप देऊन या सुमित्रादेवी म्हणजे मासाहेब आहेत असे कळते. तो जाम शिव्या-शाप देऊन मदत करण्यास नकार देतो. पण मावलीची डाव त्याला विठ्ठल का वास्ता देके मदत करायला पाठवते . माउली लगेच इकडे येऊन संग्राम बरोबर ढिशुम ढिशुम करतो. अजय अतुल वाजतच असतो. एकदिवस हातभट्टी घेऊन घरी येताना माउलीला भाऊ ( म्हणजे भाई ( म्हणजे सल्लू) ) भेटतो . भाऊ पण हातभट्टी लावून टाईट असतो. या टाईट सिच्युएशन मध्ये दोघेही आपल्या एवन संवादफेकी ने डोक्यात वीट मारून घ्यायला भाग पाडतात. पुलं म्हणतात त्या प्रमाणे एखाद्या गोष्टीचा वीट येणे म्हणजे काय ते कळते. थोड्या वेळाने निंबाळकर घराण्याचे मीठ कललेला नोकर माउलीला पूर्ण केटी देतो. संग्रामच्या बारला आग लावणे , लोकांच्या जमिनीचे कागदपत्र अगदी पाकीट मारावे या शिताफीने माउली आपली कामं करत असतो. संग्रामने सुरुवातीला हाकलले तेंव्हा थुंकही चाटायची तयारी दाखवणाऱ्या मासाहेब माउलीच्या जीवावर "हे निंबाळकरांचे रक्त आहे ... शत्रूच्या रक्ताने टिळा लावतो पण तुझे रक्त लावून मी कपाळ खराब करणार नाही " म्हणत पंचतारांकित संवाद फेकतात. मागे अजय अतुल कंटिन्यू वाजतच असतो. मग क्लायम्याक्स मध्ये संग्राम-माउली तुंबळ युद्ध होते. संग्राम आणि त्याचा बा मरतो. मग माउलीला त्याच्या आई विषयी प्रेम वगैरे येते. मला लहानपणी चित्रपटात गाणी ही कोणाचे ब्ल्याडर फुल झाले असेल तर ब्रेक म्हणून असतात असे वाटे. लय भारी पाहताना याचा प्रत्यय येतो. थोडक्यात कोणत्यातरी टिपिकल साउथच्या सिनेमाची स्टोरी उचलेली आहे.
परीक्षण बरंच लेट आलंय , त्यामुळे थेटरात जाऊन कोणी पाहणार नाही , पण कुठे डाउनलोड करून किंवा फुकट टीव्हीवर पाहताना वेळ जाऊ नये म्हणून प्रपंच .

Sunday, August 3, 2014

दवणीय :नातं त्याचं आणि तिचं



वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला पोलियो झालेला. वडील कर्मठ आणि सनातनी होते . त्यांचा आदेश होता , कोणीही कसल्याही एलियोपथीची औषधं घ्यायची नाहीत. त्यांच्या या हट्टापायी तिचे आधीची तीन भावंड गमावली होती , परंतु "देवाची इच्छा" , "गेल्या जन्मीचे भोग" अशी वडिलांची ठाम समजूत. वडिलांच्या शब्दापुढे घरात कोणाचं काही चालायचं नाही. हिचा पोलियो दिवसेंदिवस वाढत गेला. नियतीचे दुर्दैव असे की ती १८वर्षाची होई पर्यंत वडील वारले.  जास्त काही मागे ठेवलं नव्हतं. थोडंसं सोनं , राहतं घर आणि कोकणात थोडीफार शेती , त्यातूनही काही उत्पन्न होत नसे. कोणालातरी कसायला दिली तो वर्षाला २०हजार टेकवी.

आईने खानावळ सुरु केली. इन मीन ५ मुलं जेवायला येत. त्याची तिची भेट घडली जेंव्हा तो खानावळीत आला आणि तिने त्याला वांग्याची भाजी वाढली. तो खानदेशातला ,  पुण्यात कॉलेजात शिकायला आलेला. रात्री कुठेतरी कामावर जाऊन पैसे कमवायचा. घरचं खानं हवं म्हणून खानावळ लावली.  वांग्याची भाजीच्या वासाने तो टर्न अप झाला.  "अजून वाढता का ? " त्याने ताटात बघतच तिला अजून भाजी वाढण्याची विनंती केली . ती लंगडतच वळली , भाजी वाढली आत गेली.  "अजून भाजी मिळेल काय ? " तो पुंन्हा खाली बघूनच बोलला. तिने जवळपास ५-६ वेळा त्याला काहीही तक्रार न करता भाजी वाढली . तिचे लंगडने तो बघत होता.

वेळ गेला तसा दोघांचा संवाद वाढला. लोकं येत जात राहिली , हा मात्र खानावळीशी प्रामाणिक राहिला. नाही म्हणायला त्याची तिची नजरानजर होत असे. तशी ती दिसायला सुंदर होती , गोरीपान काया , लांब नाक , काळेभोर केस , वक्राकार शरीरयष्टी... तिच्या पायाचा प्रोब्लेम नसता तर कोणत्याही युवराजने तिला मागणी घातली असती.जेवणात वांग्याची भाजी असली त्याचा चेहरा फुललेला असे. आणि त्याचा तो फुललेला चेहरा पाहायला तीही आतुर असे. बऱ्याचदा त्याच्यासाठी ती पेशल वांग्याची भाजी बनवे

एक दिवस तो तिच्या आईला बोललाच ! तिच्या आईला मुलीच्या भावना समजत नव्हत्या असं नाही. पण या संसाराचं पुढे कसे होणार ? ही अशी.. ट्रेक्टरची दोन चाकं जर एकाच त्रिज्येची नसतील तर तो चालेल कसा ? पण त्याने तिच्या आईला कन्विन्स केलं.  त्याचे आई-वडील नव्हते त्यामुळे बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता.
यथावकाश लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले. तो तिला फिरायला नेई. बऱ्याचदा उचलून घेई. त्याचे शिक्षण वगैरे पूर्ण होऊन त्याला नोकरीही मोठ्या पगाराची लागली होती. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याने बरीच प्रगती केली. कोणाची नजर लागावी असा त्याचा तिचा संसार चालू होता. पण नजर लागलीच.

लग्नानंतर ती जास्त काम करत नव्हती. आठवड्यातून ५ दिवस डॉमिनोज , म्याकडोनल्ड , वगैरे होत असे  , कधी वैशाली तर कधी गंधर्व .. पुण्यात हॉटेलांचा तुटवडा का आहे ? तिचे खाणे वाढत होते. आता फिरायला नेताना त्याला तिला उचलणे अशक्य होते. तिने वजनाची सत्तरी पार केली होती. तिचे काळेभोर केस तिने कापून बॉबकट केला होता , तिच्या गोऱ्यापान त्वचेवर मेकअप च्या सामने एलर्जी उठली होती. कमनीय अंतर्वक्र फिगर आता बहिर्वक्र झाली होती. दोघांची आता वरचेवर भांडण होऊ लागली . तो ऑफिसातून आता अजूनच उशिरा येऊ लागला. रात्री १२-१ ला भांडणाच्या आवाजाने शेजार्यांची झोपमोड होऊ लागली. व्हायचं तेच झालं. त्याने तिला माहेरी पाठवायचा निर्णय घेतला , तिनेही आता परत न येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री ती घरी निघून गेली .

तिची आई आता आजारपणाने खंगली होती. काय बोलणार बिचारी. फोनवरच त्याने तिला घटस्फोटाची बातमी दिली. पण त्या पेपर्स वर सही घेण्यासाठी त्याला तिच्या घरी जावे लागले. तो घरी गेला.  जेवायची वेळ होती . तोच ... तोच त्याला तो ओळखीचा वास आला , आज वांग्याची भाजी होती. तिने त्याला वांग्याची भाजी वाढली , तेंव्हा त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो दवणीय झाला होता . त्याने सात-आठ वेळा वाण्याची भाजी मागितली . मागचा काळ त्याच्या डोळ्यासमोरून जात होता. ती जेंव्हा जेवत होती तेंव्हा तिच्या लक्षात आलं , अरे आज भाजीत मीठ नाही .. आणि हा काही बोललाही नाही. एक वेळ भाजीत केस झुरळ पाल पडली तरी त्याला चालायचं , पण मिठ कमी पडलेलं त्याला चालायचं नाही , आणि आज त्याने चक्क निमूटपणे खाल्लं ? दोघांचे ही डोळे पाणावले होते. वातावरण दवानीय झालं होतं. त्याने घटस्फोटाचे पेपर फाडले आणि तिला घट्ट मिठी मारली होती. वांग्याच्या भाजीमुळे ते परत एकदा एक झाले होते.  .

 नाही , खरंतर त्याचे अश्रू भाजीत पडल्यामुळे भाजीला चव आली होती.

Sunday, July 27, 2014

Minuscule: Valley of the Lost Ants - एक अति सुंदर अनुभव



काल स्त्रीहट्टापुढे गुढगे टेकवत  "मीनेस्क्युल - हरवलेल्या मुंग्यांची  दरी" ( शब्दश: भाषांतर )  पाहायला गेलो. तसा पूर्वी प्रोमो वगैरे पाहिलेला , पण चित्रपट लै भारी असेल असे काही वाटले नव्हते. किंवा त्याच्यावर  दोन शब्द खरडायची तसदी घेईल असेही नाही. अंमळ बादलीभर पॉपकॉर्ण आणि टिपाडभर सॉफ्टड्रिंकची सेटिंग लावून सीटवर बसलो. चित्रपटाच्या सुरुवातीला एक कपल एका अतिशय निसर्गरम्य अशा जागी  निवांतक्षण घालवत वोडकाचे दोन पेग घेत वेळ घालवत असतं. बाई प्रेग्नंट असते. अचानक तिला आतून काहीतरी जाणीव होते आणि तिचे यजमान तत्काळ तिला गाडीत बसवून रवाना होतात . जाताना पार्टीसाठी आणलेला बराचसा सामान मागे ठेवून जातात.  मी चित्रपट एनिमेशन प्रकारातला आहे हे समजून होतो आणि इथे अजून कसलाच एनिमेशनचा प्रकार दिसत नाही आणि दिसेल अशी कुठे अशाही नाही. पण तरीही ते मनमोहक दृश्य पाहून मी मात्र सुखावलेलो .

ते कपल गेल्या नंतर खरी मजा सुरु होते. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक माश्या वगैरे पार्टीच्या सामानावर तुटून पडतात. जो तो आपल्या वजनाच्या १००००० पट वजनी वस्तू उचलून पळवून नेण्याच्या मागे असतो. प्यारलली दुसरीकडे चित्रपटाच्या हिरोचा जन्म त्याच्या दोन भावांसोबत झालेला असतो . हा हिरो म्हणजे एक रंगीत आकाराचा किडा. आता हा किडा असल्याने त्याच्यात मुळातच किडे असतात , आणि त्या कारणाने तो त्याच्या फ्यामिली पासून दूर होतो आणि या पार्टी स्पॉट मधल्या एका डब्यात जाऊन लपतो.या डब्यात शुगरक्युब्ज असतात. या डब्याला ८-१० काळ्या मुग्या आपल्या वारुळाकडे घेऊन जातात .

वाटेत या किड्याची आणि मुंग्यांची दोस्ती होते. वाटेत लाल आणि क्रूर विलन मुंग्या दिसतात. काळ्या मुंग्यांचा सरदार त्याला एक शुगर क्यूब देतो पण त्यामुळे ते रागावतात.वाटेत पाठलाग करताना बरीच धमाल येते . काळ्या मुंग्यांचे कमालीचे टीमवर्क दाखवताना दिग्दर्शकाने इम्याजीनेषण आणि स्पेशल इफेक्टचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. नंतर हा हमला थेट काळ्या मुंग्यांची टीम विरुद्ध लाल मुंग्यांची टीम असा होतो . त्यात आपला किडा कशा प्रकारे त्यांना मदत करतो वगैरे पडद्यावर बघण्यात मजा आहे . हा चित्रपट चुकुनही टोरंट वर डाऊनलोड करून पाहू नये. हे चित्रपट मोठ्या स्क्रीन वर बघण्यात मजा आहे . शून्य संवाद आणि फक्त किड्यांचे गुंजन आणि भुणभुण यातूनही एखाद्या सुपर डायलॉग वाल्या चित्रपटाच्या कानाखाली मारेल असे मार्मिक चित्रीकरण यात आहे. शक्यतो मला चित्रपटात चुक्या आणि कमी काढायला आवडते पण यावेळी तसा काही स्कोप नाही .दिलखुश चित्रपट .

जमल्यास पहा :)

Monday, July 14, 2014

लाईकचे प्रकार


हुशार झुकरबर्गने "लाईक" च्या बटणाचे इंवेन्षण करून फेसबुक मध्ये ऑक्सिजन फुकला. लोकं येतात , फेसबुक वाचतात , कोणी आवडलं म्हणून लाईक करतो , कोणी पटलं म्हणून लाईक किंवा लाईक दाबण्याची बरीच कारणं असू शकतील . अस्मादिकांनी वातावरणाचा जायजा घेऊन टिपलेले हे लाईकचे काही खास प्रकार :-
१. बकरा लाईक : आपल्या लिष्ट मधला (किंवा पाहण्यातला) कोणी एखादी पोस्ट लाईक करतो म्हणजे आपणही ती केली पाहिजे या भावनेने आपसूक वाहिले गेलेले लाईक या प्रकारात येतात . येथे माणसाच्या मेंढरी वृत्तीचे दर्शन घडते.
२. सेटलमेंट लाईक : एखादा आपली पोष्ट लाईक करून गेला की कर्तव्यभावनेमुळे जे लाईक्स निघतात ते या प्रकारात. ज्याप्रमाणे स्वाभिमानी माणूस कोणाचे कर्ज बाकी ठेवत नाही , त्याप्रमाणे हे लोक कोणाचे लाईक्स उधार ठेवत नाहीत
३. जमालगोटा लाईक : अडल्यारात्री जमालगोटा घेतल्यावर दिसणाऱ्या परिणामांप्रमाणे हे लोक दिसतील ती प्रत्येक पोष्ट लाईक करत सुटतात , साईडबारवर बार बार हर बार यांचे नाव दिसत राहते. कर्ण लाजेल एवढा एवढे दानशूर या प्रकारात येतात
४. चाटे कोचिंग लाईक : या लाईक्स शक्यतो सुंदर मुली किंवा आव्हानात्मक दिसणाऱ्या महिलांच्या पोस्ट वर फोटो टाकल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून सुरु होतात. यांच्या लिष्ट मध्ये फिमेल आयडीज चा भरमार दिसतो आणि यांची टाईमलाईन एक्टीवीटी पाहिल्यास यांचे लाईक्स चाटे गिरी करण्यात वापरल्याचे दिसते .
५. परमपूज्य लाईक : शक्यतो आपल्या लिस्ट मध्ये असणारे आदरणीय किंवा सिनियर किंवा उच्च विचारवंत किंवा "सो कॉल्ड" फेमस व्यक्तीने काहीही पोस्ट केलं की ते कळो न कळो आपला आदरणीय लाईक तिथे पुरवलाच पाहिजे या हेतूने प्रेरित. कधी कधी पोस्ट वाचायला किमान ५ मिनिटे लागतात पण एका मिनिटात बक्कळ लाईक दिसल्या की आदरणीय लाईक ओळखू येतात
६. बाब्या लाईक्स : "आपला तो बाब्या" अर्थात आपल्या मताला पटणारी किंवा फेवरिंग पोस्ट असली की बाब्या लाईक ठोकला जातो. शक्यतो राजकारण , आवडता नेता किंवा पक्ष या विषयांत बाब्या लाईक्स ओळखता येतात. भले मोठे इंग्रजी लेख कधी कोण वाचत असेल अशी शंका आहे . उदाहरणार्थ : "PM Modi's extra ordinary visionary economic step" किंवा "Dr. Swami exposes himself " नुसतं हेडिंग वाचलं की भक्तांनी पोस्ट लाईक केलीच पाहिजे. आपभक्त किंवा कॉंग्रेसभक्त किंवा इत्यादी ... बाब्या लाईक्स डन !
७. आशावादी लाईक : आपण जर दुसऱ्यांच्या पोस्ट लाईक केल्या नाहीत तर उद्या न जाणो आपल्या पोस्ट वर लाईकचा सुका दुष्काळ पडेल अशा भीतीने या वृत्ती सगळीकडे आपली इन्व्हेस्टमेंट करत असतात
८. पप्पूबनो लाईक्स : लाईक करून जादू पहा , लाईक करा आणि ६९ टाईप करून गम्मत जम्मत पहा वगैरे प्रकारात स्वत:च्या अकलेचे दिवाळखोरी स्वत:च्या जबाबदारीवर पूर्ण शुद्धीत केले जातात.
९. हेल्पिंग लाईक : आपण अमकी पोस्ट लाईक केली तर तमक्याच्या अकाउंट मध्ये ऑटोमेटीक पैसे जमा होऊन त्याचे दु:ख किंवा गरज पूर्ण होईल या भाभड्या आशेपायी वाहिलेले लाईक
१०. इमोशनल लाईक : देशभक्त असाल तर , आईवर प्रेम करत असाल तर , राजे पुन्हा जन्माला यावे असे वाटत असेल तर , गणपतीने दुध प्यावे असे वाटले तर , एकाच बापाची औलाद असाल तर , वगैरे भावनिक च्यालेन्जेसला आपल्या ५६ इंची छातीने स्वीकारणारे शूरवीर या प्रकारचे लाईक देऊन आपण पाईक असल्याचे "कोणाला?" सिद्ध करतात
एवढेच सुचले , अजून सुचले तर परत कधी !

Friday, July 11, 2014

थोर संगीतकार अनु मलिक



आम्हाला अनु मलिक कळले ते असा संगीतकार म्हणून की ज्याचं संगीत इतकं महान आहे की कोणी महान संगीतकार ते आधीच चोरतो  म्हणूनच . लहानपणापासून जसं घरी इंटरनेट आलं तसा आम्हाला इंग्रजी गाण्यांचे लिरिक्स डाऊनलोड करून तोंडपाठ करण्याचा छंद जडला . याला कारण म्हणजे इंग्रजी गाण्यांचे विडीयो. तर ते असो. अनु मलिक आणि माझी ओळख तशी काही डायरेक्ट नाही . नाही म्हणजे मी त्याला ओळखतो, पण तो मला ओळखत नाही.

बाजीगर मधली त्याची कलाकृती "मै मिला तू मिली .. तू मिली मै मिला .. दुनिया जले तो जले ..."  यासारखा अफलातून प्रकार मी आजतागायत कोणत्या बडबडगीतात देखील कधी ऐकला नाही. "अरे बाबा अरे बाबा करे क्या दिवाना .. लडका जब भी लडकी देखे गाये यही गाना " या अन्नू मलिकच्या गाण्याला मकारेना वाल्यांनी आधीच चोरलं होतं . मला नक्की आठवत नाही , पण बर्याच स्पानिश , इंग्लिश आणि काही काही तर म्हणे जपानी संगीतकारांनी अनु मलिक च्या धून आणि कम्पोजीषण चोरी करून ग्र्यामी वगैरे जिंकलेल्या आहेत .

उंची है बिल्डींग .. लिफ्ट तेरी बंद है ... वगैरे गाण्यांनी अन्नू मलिक च्या संगीतज्ञानाची उंची कळते . तो चिरका भसाडा आवाज ऐकला की खुद्द ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्यामुखी वेद वदवले ती घटना पुराणातली वांगी नसून खरी आहेत हे मनोमन पटते .
अन्नू मलिक चा अजून एक वाखाणण्या सारखा गुण म्हणजे त्यांचे परम शिष्य मा.प.पु. नवज्योत सिंग सिद्धू जे आपल्या ताबडतोड शायरी साठी प्रसिद्ध आहेत , त्यांची खरी प्रेरणा अनु मलिकच.

अनु मलिक चा अजून एक बोनस गुण म्हणजे , तो एक उत्तम जज/ज्युरी आहे. 12 Angry Men (1957) , इंडियन आयडॉल , एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा ,India Got tallent , आप की अदालत वगैरे सारख्या मालिकांतून उत्तम जजमेंट दिल्याबद्दल त्यांची शिफारस खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून व्हायला हवी . पण अन्नू मलिकला कधी तो डिजर्व करतो ते मिळालंच नाही , ही त्याची नाही तर भारतीयांची शोकांतिका आहे .

बऱ्याच जणांना अनु मालिक विषयी अजुन एक गोष्ट माहिती नसेल. माझे एक दूरचे काका सान्ताक्रुजला राहतात, त्यांचं फिल्मसिटी मध्ये येणं-जाणं असतं. ते सेट वर दुधाच्या पिशव्या , केळ्याचे गड , ब्रेड-बुरून-बनपाव वगैरे पुरवायच काम करतात . त्या काकांनी सांगितलेला किस्सा . अनु मलिक ला ५ केळी , एक ब्रेड चा अख्खा पुडा , दुध आणि वरून अमूल बटरचं एक अख्ख पाकीट एकत्र काला करून खायला आवडतं. त्याच्या हाताची बोटं इतकी मोठी आहेत की महिला ज्या बांगड्या हातात घालतात त्या बांगड्या अनुच्या बोटात बसतील. अनु हार्मोनियमची २-३ बटनं एकसाथ दाबतो . तबल्याची कितीतरी पानं अनुच्या बोटांनी हाय खाऊन फाटलेली आहेत.

खरच , एवढं असूनही अनु खूप डाऊन टू अर्थ आहे असे माझ्या त्या दूरच्या काकांचे मत आहे . अनु मलिक ला शतश: प्रणाम .

Saturday, July 5, 2014

क्रिकेटचा ओवरडोस

हे MCC विरुद्ध ROW ची म्याच म्हणजे थोर क्रिकेटर्सची मंगळागौर वगैरे वाटू लागले आहे. गेला बाजार सगळे राजकारणी एखाद्या गैरराजकीय कार्यक्रमासाठी एकच मंचावर जमले आहेत , आणि ते एकमेकांची अत्यंत मुक्तकंठाने स्तुती करत आहेत , हे जेवढं गुळचट वाटतं तेवढी गुळचट मला ही म्याच वाटते. फक्त आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ बघावा इतकंच सार काय ते यात. पण ते म्याच स्पिरीट , ते टशन आणायचं कुठून ?
मला लेट ९०ज किंवा २००५-६ च्या आधीचं क्रिकेट आठवतं. भारंभार सेरीज नसायच्या. श्रीखंडपूरी रोज खायला दिली तर त्यातला आनंद निघून जातो. त्यावेळीची श्रीखंड पुरी म्हणजे भारत पाकिस्तान म्याच. दौरा फिक्स झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ग्रामपंचायतीत जाऊन एकूण एक पेपरचं शेवटचं पान वाचायचो. त्यावेळी २४x७ न्युज च्यानेल्स नसत. पेपरात कॉलम्स वाचायची ओढ असायची. म्याच पाहिलेली असली तरी दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचायला मजाच यायची.
सईद अन्वर , अमीर सोहेल , वकार , सक्लेन , इंझमाम , सलीम मलिक, वसीम चा भरणा असलेली टीम गांगुली , तेंडूलकर, द्रविड,कुंबळे , अझुरुद्दिन , प्रसाद श्रीनाथ, नयन मोंगिया , मांजरेकर वगैरे लोकं असलेल्या टीम बरोबर खेळायची . त्यावेळी बहुतेकदा भारत हरायचा. म्याचेस शारजा मध्ये व्हायच्या. त्यावेळी पहिल्या बॉलपासून जो थ्रील असायचा तो थ्रील किमान मला शेवटचा कधी मिळाला ते आठवत नाही. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियातल्या म्याचेस मी रात्री २-३ वाजता उठून पाहायचो. तेंडूलकर ओपनिंग करायचा आणि चामिंडा वास किंवा एलन डोनाल्ड किंवा मेग्रा जेंव्हा रन अप घ्यायचे तेंव्हा काळजाचे ठोके ऐकू येत. वर्ल्ड कप मधल्या पाकिस्तान विरुद्धच्या म्याच मध्ये सचिन ने टोलावलेला थर्ड म्यान वरचा सिक्सर किंवा कॅडीकच्या त्या शोर्ट बॉलवर एक पाय पुढे घेऊन मिड विकेट वर खेचलेला षटकार , कधी हेन्री ओलोंगाची काढलेली लक्तरं तो सचिन पुन्हा अनुभवावासा वाटतो. सौरव गांगुलीचा ऑफ ड्राईव ऑफकट किंवा डाऊन द विकेट येऊन मिड ऑन ला ग्राउंड बाहेर टोलवलेला षटकार , किंवा सेहवागने एकाच ओवर मध्ये ५ चौकार मारणे , किंवा कुंबळेने दिवसभर रडकुंडी आणलेल्या स्टीव वॉ ची विकेट घेणे , हरभजनची कोलकात्यातली हेट्रिक किंवा सेहवागची मुलतानी ट्रिपल सेंच्युरी .... यात जे थ्रील होतं ते गवसत नाही. भारत हरणे किंवा जिंकणे मोठी गोष्ट असायची.
आता त्या निघून गेलेल्या मेमरीज या पद्धतीने खेळवल्या गेलेल्या गुळचट म्याचेसमुळे परत येणे नाही. लय क्रिकेट झालं चांगलं झालं का वाईट झालं ?

Sunday, June 29, 2014

आधुनिक तुकाराम

मागासपण देगा देवा |
त्यांसी आरक्षणाचा खवा ||

ओपनवाले रत्न थोर |
तया ओपनचा हा मार ||

ज्याचे जाती उच्चभ्रूपण |
तया जगणेही मुश्कील ||

तुका म्हणे जात |
व्हावे मागसाहून मागास ||

- संत तुकाराम

ता.क. तुकाराम महाराज स्वत: बेनीफीशीयरी होत. त्यामुळे तुकारामांना द्राक्ष आंबट नव्हेत.

तिरस्कारमूर्ती माणूस

मला वाटलं संपूर्ण पृथ्वीवर  जर एकच देश असता तर माणसाने कदाचित कोणाचाही दुसऱ्या देशाचा म्हणून तिरस्कार केला नसता. ही देशाची बंधनं तोडली पाहिजेत.  पण तोच पाहिलं , एकाच देशातली लोकंही  धर्माच्या नावाने दुसऱ्याचा करतच असतात की .

मग मला वाटलं, जर हा धर्मच नसता तर किती बरं झालं असतं , सगळेच एका धर्माचे असते तर हे दुसऱ्या धर्माला कमी लेखणे , त्यांचा तिरस्कार करणे कदाचित थांबलं असतं . पण नाही , सगळे एकच धर्माचे असते तर त्यात जाती आहेत.

मुद्दा जातीच्या उच्च-नीचतेच असो किंवा आरक्षणाचा , काहीतरी कारण आहेच तिरस्काराला. मग मला वाटलं, साला एकच धर्म आणि एकच जात असती तर निदान हा तिरस्कार कमी झाला असता .

पण नाही .. त्यातही आमच्या पोटजाती आहेतच . स्वत:ला वरचा समजायचं दुसऱ्याला कमी लेखन म्हणजे तिरस्कार एकच धर्म एकच जात असली तरीही आहेत.

मग मला वाटलं , पोटजातीही नकोत. सगळ्यांत भावकी हवी. सगळेच एकमेकांचे भौभौ. तोच मी पाहिलं भावकी-भावकी मध्ये तर अजूनच जास्ती तिरस्कार आहे. एकच धर्म जात पोटजात आणि भावकी असली तरीही तिरस्कार मात्र कायम आहे .

तिरस्कार काय संपत नाय लका !

Thursday, June 26, 2014

प्रोफाईल पिक अर्थात डीपी ग्रुप

    फेसबुकवर वावरताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती दिसतात . प्रत्येकाची आपली एक तऱ्हा असते पण तरीही काही बाबतीत एकसमानता आढळते. उदाहरणार्थ, प्रोफाईल पिक. त्यारून सुचलेली काही निरीक्षणे

०. पालक ग्रुप : यांचे आयुष्य म्हणजे यांची मुलं . यांच्या आयुष्यातली इतकी स्पेस मुलांनी व्यापलेली असते की त्याची व्याप्ती फेसबुक वर न आली तर नवलच . हे आपल्या मुलाचे किंवा मुलीचे गोंडस गोंडस फोटो प्रोफाईल ला लावतात . आपले फोटो दाखवण्यात त्यावर लाईक मिळवण्यात यांचे स्वारस्य संपलेले असते . आता जे काही आहे ते मुलांचे . समर्पणभावाचा आदर्श नमुना आपल्याला येथे पाहायला मिळतो .

१. बकुळा ग्रुप :  या ग्रुप मध्ये शक्यतो म्हैलावार्गाचा समावेश होतो. गुलाब , मोगरा, बकुळा वगैरे देशी फुलांचे प्रोफाईल पिक लावणे हे या ग्रुप मध्ल्यांचे लक्षण. व्यक्ती जर फॉरीन रिटन/सेटल असेल तर ट्युलिप वगैरे सारखी उच्च जातीची फुलं यांच्या प्रोफाईल वर झळकत असतात. झेंडू , धोतरा वगैरे सारखी डीपी लावणारी बाप्या लोकं अजून तरी दिसली नाहीत 

२. सॉक्रेटीस ग्रुप :  या ग्रुपच्या डीपी मध्ये काही तरी गहन अर्थ असतो. किंवा एखाद्या महान विचारवंत / समाजसुधारक वगैरेच्या कोट्स फोटोसह असतात . ही मंडळी शक्यतो चाळीशी ओलांडलेली विचारवंत किंवा शिकून घरी बसलेल्या गृहिणी असतात. यांच्या प्रोफाईल पिक वरून हे धीरगंभीर आणि हायली इंटेलेक्च्युअल स्वभावाचे असल्याचे दिसते.

३. पेज थ्री ग्रुप : करीना, कतरिना, विद्या, रणबीर, ह्रितिक वगैरेचे डीपी पहिले की पेज थ्री ग्रुप वाले ओळखावेत. शक्यतो यांच्या प्रोफाईलवर, कव्हरवर किंवा वॉलवर  जळीस्थळी सगळीकडे सेलेब्रिटीज चे नेटवर फिरणारे फोटो असतात. यांचा फेसबुकचा वापार बहुतांशी   "प्लीज एड मी , सेंड मी फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे टाईप कमेंट टाकून  वासूगिरी करण्यासाठी असतो. नवे नवे फेसबुक वर आलेले टीनेजर किंवा वयाने वाढलेले परुंतु मनाने अजूनही अठराव्या वर्षातच अडकलेले या प्रकारात समाविष्ट होतात. 

४. अंडरकवर ऑफिसर :  यांच्या प्रोफाईलची स्थापना झाल्यापासून यांनी प्रोफाईल पिक ला हात लावलेला नसतो. हे कायम कोरे करकरीत असतात. यांच्या प्रोफाईल बऱ्याचदा पूर्ण कोऱ्या असतात . आपण कोण कुठले का कधी कुठे कसे आहोत हे सांगण्यासाठी हे फेसबुक वर नसतात. हे अंडरकवर राहून टेहेळणी करतात. 

५. तुकाराम ग्रुप : "लहानपण देगा देवा ... " या तुकारामांच्या उक्तीने प्रेरित यांचे वय काहीही असले तरी प्रोफाईल पिक मात्र बालपणीचाच असतो. यांना भूतकाळात रमणे आवडते . हे बर्याचदा दवणीय पोस्ट्सचे शिंतोडे उडवत असतात.

६. गरिबांचे आंद्रे इस्तेवान ग्रुप :  हे पट्टीचे ( हौशी नव्हे)  फोटोग्राफीची आवड असणारे, भल्या मोठ्या लेन्सेस आणि महागडे DSLR राखणारे फोटोग्राफर.  कुठेतरी मिलिटरी स्टाईल मशीनगनचा नेम धरावा तसा कॅमेरा हातात धरून गवतात लोटांगण घातलेले किंवा ते ५ किलोचे कॅमेरे खांद्यावर टाकून हसरा चेहरा करणारे , कधी डाव्या कानामागून कमरेच्या हाईटच्या कोनातून काढलेला आकाश अर्ध शरीर आणि अर्ध आकाश दिसणारा तर कधी डोंगरदऱ्याच्या कड्यावर उभे राहून गड जिंकल्याच्या अविर्भावात असणारा फोटो यांच्या डीपीवर असतो .

७. कट्टर देशप्रेमी ग्रुप : छावा , मर्द मराठा , कडवा हिंदू किंवा सावरकर आणि भारतमातेवर प्रेमाने ओतप्रत देशावर जान निछावर करणारे , क्षणात देशरक्षणासाठी छातीवर गोळी झेलायला तयार असलेले हे प्राणी आपल्या प्रोफाईलवर राजेंचा अश्वारूढ , किंवा बाळासाहेबांचा एक बोट समोर दाखवणारा , एखादा भगवा फडकणारा किंवा देशप्रेमी फोटो आपल्या डीपीवर कर्तव्य असल्याप्रमाणे लावून असतात . यांची वॉल शक्यतो पूर्णपणे भगवी असते. हे छावे  डेली आपल्या देशप्रमाचा कोटा फेसबुक वर रिते करतात

८. निषेधप्रेमी : कुठे खुट्ट झालं तरी दुसऱ्या सेकंदाला प्रोफाईलवर काळा पडदा पडलाच म्हणून समजावे. किंवा यांच्या प्रोफाईल काळे चित्र आल्यास कुठेतरी काहीतरी अप्रिय घडले आहे हे समजून घ्यावे . अत्यंत हळवी , सेन्सिटिव्ह जमात

९. कार्यकर्ते ग्रुप : मोदींचा , केजरीवालचा , पवार साहेबांचा , राज साहेबांचा , मोठ्या आणि छोट्या ठाकरेंचा किंवा कुठल्याही लोकल नेत्याचे "एकच वादा.... " टाइप्स डिस्प्ले पिक पहिला की कार्यकर्ते आहेत हे समजून घ्यावे. जास्त( किंवा अजिबात) नादी लागू नये

१०. रंगरंगरंगीलारे ग्रुप : सध्या फोटोलाही फोटोशॉप/पिकासामध्ये एक्स्ट्रीम रेड , ग्रीन किंवा ब्लू किंवा कृष्णधवल केलेले फोटो कायम यांच्या प्रोफाईलवर असतात. जर प्रत्यक्ष पहिले नसेल तर हा काळा की गोरा , चकणा की चपटा हे चुकूनही कळणार नाही. बेक्कार इफेक्ट मारलेले फोटो लटकावून असतात. माणसाच्या डोळ्यांना सहन होतील अशा कलरचे फोटोज हे मुद्दाम लावू इच्छित नसावेत असा एक संशय आहे.

११. लक्ष्मीनारायण ग्रुप : यांच्या प्रोफाईल मध्ये हे एकटे कधीच नसतात. जॉईन्ट अकौंट असल्याप्रमाणे नर-मादी कायम एकमेकांच्या गळ्यात हात टाकून, किंवा एकमेकांच्या कुशीत खुशीत असलेले ,लग्नाचे एकमेकांना हार घालणारे किंवा हनिमूनला गेले तर समुद्राकाठी किंवा बर्फात एकत्र आनंद घेताना आपल्याला कायम दाखवतात.कधी कधी हे जन्मल्यापासूनच शरीर जोडून आले आहेत की काय असाही संशय येतो.  

१२.काढलाकीलावला ग्रुप : हे मोबाईलवरून फेसबुक एक्सेस करतात. कुठेही गेले की ताजे फोटो थेट कॅमेऱ्यातून प्रोफाईलवर चिटकवतात. हे फक्त प्रोफाईल पिक्चर बदलत असतात . बाकी प्रोफैल्वर काहीही अपडेट सापडत नाहीत .

१३. आयकॉन ग्रुप  :  हे एकदमच वेगळे असतात.  कधी स्पायडरम्यान , कधी जोकर , कधी चे , कधी कोणता फुटबॉल प्लेयर , क्रिकेट प्लेयर ... कोणता ना कोणता पब्लिक आयकॉन यांच्या प्रोफाईलवर विसावतो. पण त्या आयकॉनमधून यांचा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो. हे फक्त लावायचे म्हणून लावलेले आयकॉन नसतात.

१४. एकवचनी  श्रीराम ग्रुप : प्रोफाईल बनवते वेळी जो फोटो लावला त्यावर एकनिष्ठता पाळणारे  यांचा ग्रुप पिक फिक्स असतो . श्रीराम एकपत्नी एकवचनी होता , हे एकडीपी असतात. फोटोही बऱ्याचदा लावायचा म्हणून एखाद्या पासपोर्टसाईजचा फोटो लावलेला असतो .

तूर्तास इतकेच .

Tuesday, May 13, 2014

ब्रेकिंग न्यूज : पीएम बननेके बाद भी गुजरात सीएम की कुर्सी नही छोड़ेंगे नमो.



दिल्ली  ( टीटीआय) १३ मई : एग्जिट पोल्स की धूम मची हुयी है . गौरतलब है की आने वाले दिनों में गलती से पीएम बनने के बाद भी नमो जी ने सीएम की कुर्सी छोड़नेकी संभावनाको सिरेसे खारिज कर दिया है . एक भाजपाई नेता नाम ना बताने के शर्त पे बताया के गू की तरह चिपके रहेंगे नमो . उल्टा पीएम के साथ साथ सारी मिनिस्ट्री और भाजपाशासित राज्यों के भी बनेंगे सीएम. वसुंधरा मौसी , शिवराज चिच्चा और परिकर अंकल को छुट्टी पे भेजा जाएगा. भारत का नाम बदल के नमोस्तान किया जाएगा. करेंसी पे नमोकी फोटो छपेगी , जिससे रुपये के मुकाबले डॉलर ६०० होने के आसार है. रूपया अब नमोरूपया कहेलायेगा. सरदार पटेल की आड़ में जो पुतला बनेगा उसका मुह श्रीमान मोदीजी का होगा. उसको सफ़ेद दाढ़ी पैरिस के मशहूर ब्रेंड प्राडा कंपनी के लेदर से बनेगी. 

हमारे संवाददाताने बताया, के एग्जिट पोल के बाद के नतीजो के बारे में कुछ कहा नहीं जा सकता इसलिए अभी जीतना हौव्वा किया जाए उसको बनानेकी तय्यारी जोरोसे है. भारत के रक्षामंत्री , अर्थमंत्री , सूचना एवं प्रसारण मंत्री , गृहमंत्री से लेके सारे मंत्रिपद मोदिजी अपने पास ही रखेंगे. और तो और विरोधी पक्ष नेता भी खुद नमो होंगे. उनकी माने तो नमो के खिलाफ किसी के होने का सवाल ही नही बनता. और जो की अब की बार मोदी सरकार , तो इसमें बीजेपी का भी कोई रोल नही होगा. संसद के अन्दर सिर्फ नमो होंगे. बाकि कुर्सीयो पे नमो के थ्रीडी होलोग्राम बैठेंगे. सदन के स्पीकर भी नमो ही होंगे. सदन की चर्चा नमो अपने आप से ही कर लेंगे और फैसले भी तुरंत सुनायेंगे. और स्पीकर के बाजु में जो बैंड वालो की पोशाख में हाथ में डंडा लिए आदमी होता है वो अमित शाह होंगे.

नमोने सत्ता में आने के बाद का एक्शन प्लान तैयार कर लिया है . पहले पांच साल तो वो खानेमें व्यस्त होंगे और कारण ये रहेगा के यूपीए ने बहोत से गढ्ढे किये है उन्हें भरने में टाइम लगेगा. एक पांचवी कक्षा के छात्र ने बताया , अरे चाचाजी तो चुनावखर्च के गढ्ढेको यूपीएके गढ्ढे का नाम दे रहे है . हाला के इस बच्चे का आय्क्यु और समझ एकदम सामान्य है. अदानी अम्बानी से आहत , नमो अब खुद का "एयरफ़ोर्स वन" लेंगे

दूसरी तरफ भक्तो में काफी उत्साह है. सोनिया और कम्पनी सामान प्याक कर के जल्द ही भारत छोड़ इटली में डॉन वीटो कार्लोन के पास चली जाएगी. नमो देश में बहोत सारी
 योजनाए भी लागु करवाएंगे. नमो चाय बनाव उल्लू बनाव योजना , नमो हवामहेल गृहयोजना , नमो शिक्षा का अधिकार योजना , नमो दंगाप्रशिक्षण योजना आदि योजनाये साल के आखरी महीने में लग जाएगी . नमोफैन्स की माने तो सारे नमो विरोधीयो को पाकिस्तान भेजा जाएगा लेकिन तभी किसी भक्त ने कहा , अरे लेकिन  कराची-लाहोर के साथ पूरा पाकिस्तान नमो कॉन्कर करने वाले है , अफगानिस्तान , तुर्कस्तान , ब्रम्हाप्रदेश , भूटान , नेपाल, म्यांमार बांग्लादेश के साथ साथ चायना , नार्थ और साउथ कोरिया , जापान आदि छोटे मोटे देश नमो के आगे सरेंडर कर भारत में विलीन कर लिए जायेंगे.

मौसम विभाग की माने तो काफी बदलाव आने वाला है. लोगो की सोच बदलने वाली है. पहले लोग सरकार को गाली देकर  अपने बच्चो की स्कुलो में लाखो की डोनेशन देते थे , अब वे तारीफ कर के उतनीही डोनेशन देते रहेंगे. इस बार की मेहेंगाई से देशवासी खुशही रहेंगे क्योके वो मनु ने नहीं नमो ने कराइ होगी  तो अच्छीही होगी. हाला की पुलिसवाला रिश्वत लेता रहेगा लेकिन ये पैसा अब सोनिया के पास नहीं नमो के पास जायेगा इस लिए पिंटू खुश है. गैस के दाम चार गुना होने के बाद भी गुप्ता आंटी खुश रहेगी क्योंके ये बढ़ोतरी उनके अपने मोदीजीनही कराइ होगी. पुणे के दादासाहब शाहापुरे अब १५०रूपया लीटर का पेट्रोल भी बड़े आनंदसे भरेंगे. और एक दिन विरोधक भी कह उठेंगे भाई नमो ने सब की लाइफ सेट कर दी. कितना बदलाव आया है .

खैर छोडो , अम्बानीजी का नमो को फोन आया था , "अच्छे दिन आ गए है" ऐसा कुछ बक रहे थे.

- टारझन, एमसीबिसी न्यूज

Saturday, February 1, 2014

VCR



90's च्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी VCR चं युग होतं तेंव्हाची गोष्ट . VCR ची वाट बघताना जेवढी एक्साईटमेंट असे तेवढी हल्ली कशात असते ते माहित नाही ( हल्ली कशातच एक्साईटमेंट वाटत नाही म्हणा )
त्यावेळी गणेशोत्सवात मंडळातर्फे VCR आणि २९" मोठा डबडा CRT  कलर टीव्ही आणला म्हणजे मंडळाने लै मोठा तीर मारलाय वगैरे वाटायचं. खेडेगावात VCR येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची . २ हिंदी आणि १ मराठी सिनेमा असलं गणित ठरलेलं असायचं. गणपतीच्या दिवसात अंथरून पांघरून घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या मांडवाच्या आवारात पिक्चर बघण्याचा प्रोग्राम असे . त्यासाठी फळ्यावर कोणता पिक्चर किती वाजता आहे हे २ दिवस आधीपासून लिहिलं जायचं. ठरलेल्या दिवशी मंडळातली थोडी थोराड पोरं शेजारच्या गावातून टीव्ही + VCR घेऊन येत . ते कधी येतात याची बाकी मेम्बर फार आतुरतेने वाट बघत. बेडशीट मध्ये गुंडाळून एक जन तो भला मोठा टीव्ही आणि एक जन तो VCR  घेऊन येत असे . सगळी चिल्लर ग्यांग त्यांच्या मागे मंडळाच्या स्टेज पर्यंत मागे यायची. थोराड पोरं बळेच मोठे शास्त्रज्ञ असल्याच्या अविर्भावात टीव्ही आणि VCR ची असेल्म्बी करत.  ( माइंड  इट , हे काम मला त्यावेळी 'so cool'  वगैरे वाटायचं ) हळू हळू हळू पब्लिक सेट व्हायचं. मंडळात असलेला नसलेला व्हीसीआर वरचा पिक्चर बघायला हजर व्हायचा .  नेहमी प्रमाणे सेट अप करता करता बराच वेळ निघून जात असे . बर्याचदा कॅसेट अडकायची . बर्याचदा कोणीतरी रिमोट दाबून ते फास्ट फोरवर्ड /ब्याकवर्ड करायचे. गाणी चालू असतील तर तो फास्ट  फोरवर्ड मधला डान्स पाहून मला मोठी गमत वाटायची .

मावशीकडे गेलो की तिकडेहि VCR आणायचो.घरीच कलर टीव्ही असल्याने तिकडे फक्त VCR आणला की काम भागायचं. शिवाय माझ्या मावसभावाचा मित्रच व्हीसीआरवाला असल्याने नवीन चित्रपटांच्या कॅसेट मिळत . २ दिवस व्हीसीआर असला की आम्ही ब्याक टू ब्याक चित्रपट बघायचो . त्यावेळी अक्षय कुमार - सुनील शेपटी (शेट्टीचे त्यावेळचे आम्ही ठेवलेले नाव ) चे चित्रपट नुसते ओरपून ओरपून बघायचो  :)  जिगर , मोहरा , खिलाडी , खिलाडीयो का खिलाडी पासून बरेच चित्रपट त्याकाळी आम्ही VCR वर पाहिले. त्यावेळी चित्रपट बघायचे म्हटलं की भयंकर थ्रिल असायचं. आताची परिस्थिती वेगळीच आहे . VCR कालबाह्य झाले. मल्टीप्लेक्स आले , मल्टीच्यानेल संस्कृती आली . नवीन चित्रपट महिन्याभरात टीव्हीवर येउन जातो  पण बघावासा वाटेलच असे नाही . चित्रपट आता मी माझ्या आवडी-निवडीने बघतो . आता ते चित्रपट बघताना फास्ट फोरवर्ड ऐवजी फक्त स्किप चं बटन चालतं . ते फास्ट फोरवर्ड केल्यावर स्पीड मध्ये नाचणाऱ्या नट -नटी  दिसत नाहीत . चित्रपट बघताना पूर्वी सारखं थ्रिल नाही .

असो , आत्ताच एक मुव्ही IMDB वर सिनोप्सिस आणि रेटिंग पाहून डाऊनलोडिंग ला लावला. कधी बघेन माहिती नाही . गेल्या महिन्याभरात किती पिक्चर डाऊनलोड केलेत आता आठवतही नाही . ते बघायचा मुहूर्त कधी लागेल माहित नाही .

व्हीसीआर ची आठवण मला नेहमी नॉस्टेल्जिक करते .  

Sunday, January 12, 2014

आप'ली आशा

पूर्वी हातात ब्याट न पकडलेले  फलंदाजी कोच  तेंडूलकरने स्ट्रेट ड्राईव्ह कसा करावा ते सांगत. त्याच्या ब्याट-प्याडच्या ग्यापमध्ये मध्ये किती इंचाचा चुकीचा फरक आहे हेही सांगत. तेंडूलकरने १००व्या शतकाचे दडपण न घेता मैदानात कसे दडपण विरहित होऊन नैसर्गिक खेळी करण्याच्या थेरींनी फेसबुकची भिंती लाल होत असत. त्याने कधी निवृत्त व्हावे याचेही तर्कसंगत विवरण येत असे ( ज्यात मी पण होतो  :)  ) तेंडूलकर जर या सगळ्यांचं ऐकून खेळला असता तर आज तो तेंडूलकर असता का असा विचार मी नेहमी करायचो.
पण तेंडूलकर स्वत:च्या खेळाचे समीक्षण स्वत: करत नसेल का ?  आपले फुटवर्क किंवा ऑफकटर फ्रंटफुट वर खेळताना ब्याट आणि प्याड मध्ये किती ग्याप हवी किंवा कधी ब्याट खाली आणावी हे त्याच्या पेक्षा कोणत्या फेसबुक कोचला जास्त कसे कळत असेल ?  तेंडूलकरची झिम्बाब्वे मध्ये खेळण्याची रणनीती पाहून  आपण तो ऑस्ट्रेलिया मध्ये पण असाच खेळेल असा तर्क काढायचो का ? किंवा रणजी सामन्यात ज्या तंत्राने किंवा ज्या स्पीड ने खेळतो त्याच स्पीड ने तो  लॉर्डसच्या मैदानावरची अंतरराष्ट्रीय कसोटी खेळेल काय ?  आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे , तेंडूलकर ने पदार्पणात खेळताना ज्या चुका केल्या असतील , त्या चुकांवरून तो स्वत:च शिकून अधिकाधिक प्रगल्भ होत त्याने आपल्या खेळात सुधारणा केली असेल का ? ती केली असल्याशिवाय तो तेंडूलकर होऊ शकला नाही.
तेंडूलकरचं जाऊ द्या  , आपण रोहित शर्माला पण अधिक चान्स दिले आहेत .

सांगण्याचा मुद्दा असा , आजकाल राजानीती विशेश्द्न्य , अर्थकार , सामाजिक-नागरिक शास्त्राचे तद्न्य किंवा गव्हर्नन्सचा तोंडी अनुभव असलेले विश्लेषक हल्ली केजरीवालच्या कोणत्याही एका कृतीतून त्याच्या दूरगामी परिणामांची अत्यंत विनोदी समीक्षा करताना दिसतात. या समीक्षक तज्ञात आता चेतन भगतचीही भर पडली आहे.  सुतावरून स्वर्ग गाठण्याच्या आणि ललित लेखनातून केजरीवालच्या दिल्लीतल्या एखाद्या शोर्ट टर्म निर्णयाचा पूर्ण देशावर कसा भयंकर परिणाम होऊ शकतो हे समजून सांगणारे  मजबूत आकडेवारी पेरून मेगाबायटी लेखांचे बागायती पिक फेसबुक वर दिसू लागले आहे.  केजरीवाल कोणते निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतो आणि त्या निर्णयाचा परिणाम काय होईल किंवा कृतीचा देशात काय संदेश जाइल याचा त्याने विचारच केला नाही असा बऱ्याच जणांचा समज असावा. त्यातच  ज्याने पहिल्यांदाच आपल्या पार्टीला मिळणारी फंडिंग पब्लिक केली , त्याच्याच फंडिंग वर फुल ऑन ताशेरे ओढले जातात आणि शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण केली जात आहे . दुसरीकडे अन्य पक्षांना होणाऱ्या हजारो करोडोंचे बिनामी फंडिंग कुठुन आणि कोणत्या कंडीशन वर होते याबाबद विशेषज्ञांचे पूर्ण मौन आहे . एखाद्या शॉर्टटर्म सबसिडीमुळे  करदात्यांच्या पैशाचा कसा दुरुपयोग आहे आणि त्याने सरकारच्या तिजोरीवर कसा खड्डा पडतो त्याच्याही मेगाबायटी थेरी हल्ली वाचायला मिळतात.  ( सबसिडी चूकच आहे, पण ती पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि सगळ्याच पक्षांनी आपापल्या मतपेटीचे हित साधण्यासाठी वेळोवेळी दिली आहे /देत आलेले आहेत ) मात्र  राजकारणात कमावलेला काळा पैसा आणि या सबसिडीच्या पैशाची तुलना केल्यास काळा पैसा बराच जास्त आहे. मग हा पैसा सबसिडीच्या रुपात दिला तर त्राहि होते आणि जर खिशात घालून स्विस ब्यांकेत पाठवला तर मात्र आमच्यात कोणालाही आक्षेप नसतो. दिल्लीतल्या मुद्द्यांवर केलेले राजकारण आणि तिथे घेतलेले निर्णय हे अख्ख्या भारतात लागू होतील आणि तेच निर्णय अनंतापर्यंत लागू राहतील असा तर्क करणारांचा मला प्रचंड हेवा वाटतो.

केजरीवालला मी अण्णा आंदोलनापासून फॉलो करायला सुरुवात केली. त्याची बरीच भाषणं ऐकल्यावर इंटरेस्ट वाढला मग त्याच्या ब्याकग्राउंड वर वाचायला सुरुवात केली . अण्णा आंदोलन केल्यावर मला वाटायचं केजरीवाल राजकारणात यावा , तेंव्हा तो वेगळी पार्टी काढेल ही कल्पनाच नव्हती त्यामुळे तो बीजेपीत असावा असं  वाटे. त्याला कोणतीही पार्टी जॉईन करणे सहज सोपे होते . बीजेपी चे तमाम प्रवक्ते त्यानंतर केजारीवालवर होणाऱ्या कुठल्याही टीकेला आरामात हवेतल्या हवेत परतवण्यात सक्षम होते. ते खूपच सोपे होते. वेगळी पार्टी बनवणे आणि ती नावारूपाला आणणे तेही कोणताही पक्का आधार नसताना …. ही खूप मोठी गोष्ट आहे . तो काय करत होता , त्याचे परिणाम काय होतील , कोणत्या मुद्द्याचं राजकारण करावं , पक्षाचं नाव , चुनाव चिन्ह , रणनीती आणि मुख्य म्हणजे बोलण्याची पद्धत या सगळ्यांमुळे "आप"चे आजचे स्वरूप आहे. कोणी म्हणेल कॉंग्रेस मागून यांना सपोर्ट करते आहे , कोणी म्हणेल हा सगळा मिडियाने उभा केलेला पक्ष आहे . असे म्हणणारे स्वत: या गोष्टींशी किती कन्विन्स आहेत याबबद शंका आहे.

कदाचित मी चुकीचा असेल. केजरीवालच्या पार्टीमध्ये इम्याच्युरीती असेल  , निर्णय चुकीचे अस्तातील. पण हे आधी प्रुव व्हायला हवे.  फक्त विरोधी पार्ट्या म्हणतात म्हणून त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवणे रास्त वाटत नाही. मला आशा आहे. इन वर्स्ट केस सिनारियो , आप फेल होईल …… पण देशाचे वाटोळे होईल किंवा देशाचा पाकिस्तान होईल हे जरा अति वाटते. विरोधी पार्ट्या आरोपच करणार , त्यांच्याकडून आप चे कौतुक करण्याची अपेक्षाही हास्यास्पद आहे. सगळ्या पार्ट्या २०१४ डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. हा हक्क फक्त आप वाल्यांना नाही असे वाटते . कोणी म्हणते  आप मुळे कॉंग्रेस ला फायदा होऊ शकतो . माहित नाही  , पण या वाक्याचा दुसरा अर्थ हा आहे की आप मुळे बीजेपीला तोटा होऊ शकतो. आणि हीच बिजेपिची दुखरी रग आहे .  वोट फोर इंडिया च्या नावाखाली वोट फॉर बीजेपी किंवा वोट फोर मोदीची गोम आहे . त्यात बिजेपिची काही चूक नाही . पण असे करताना आपण कोणत्या पद्धतीचे राजकारण करतो हे पाहायला कोणीही तयार नाही. समर्थकांनी मोदींना प्रधानमंत्री बनवून टाकले आहे. त्यांचे नेतेही म्हणतात  आता फक्त मतदानाची औपचारिकता बाकी आहे , जनतेचे प्रधानमंत्री मोदीच आहेत . मग येवढा विश्वास आहे तर कशाला एवढा त्रागा करताय ? शांत बसून आपली इज्जत वाढवण्यात शहाणपणा नाही का ? वाढते आहे ती फक्त नफरत .  मतदारांचे पोलरायझेशन करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे . आणि सद्यपरिस्थितीत फक्त आप कशी दोषी आहे हे ठासणे चालू आहे . वैयक्तिक सांगायचं झाल्यास मी कोणतीही गोष्ट आजमावल्याशिवाय तिच्या बरोबर-चूक च्या निष्कर्षाशी येऊ शकत नाही. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा गर्विष्ठपणा मला मान्य नाही . निर्णय चुकू शकतो पण म्हणून तो ट्राय करूच नये ही नकारात्मक मानसिकता आहे.

अधिकाधिक वर्षे कॉंग्रेसचीच सत्ता असण्याचे एक ढोबळ कारण आहे की विपक्ष (पक्षी बीजेपी ) मजबूत नव्हता. आज बर्याच जणांना "बीजेपी हवी" यापेक्षा "कॉंग्रेस नको" ही धारणा जास्त आहे. कॉंग्रेसने व्यवस्थित शासन करून जनता समाधानी असूनही अधिक समाधानासाठी बीजेपी हवी असे चित्र कधी नव्हते आणि असेक अशी आशाही  नाही.
उत्तरप्रदेश मध्ये ज्या प्रमाणे  सपा-बसपा या दोघांचा बुद्धिबळाचा खेळ चालतो त्याप्रमाणे केंद्रात युपीए-एनडीए चे आहे . कम्युनिस्ट किंवा डाव्यांचा ऑप्शन एवढा विक आहे की तो कधीच विश्वास संपादन करू शकले नाही . त्यांची तशी महत्वाकांक्षा  होती असेही दिसत नाही . एक न्युट्रलपणे विचार केला तर दिसतं की बर्याच प्रस्थापित पार्ट्या आहेत आणि त्यांचे राजकारण हे त्यांच्या वोट ब्यांकेच्या आजूबाजूला फिरते. कॉंग्रेस सेक्युलर किंवा पुरोगामी आणि मुस्लिम मतदारांना गोंजारते तर बीजेपी हिंदुत्ववाद्यांना गोंजारते. शिवसेना-मनसे मराठी लोकांचे  राजकारण करते. मायावती दलित मतदारांचे राजकारण करते तर ममता पासून जयललिता पर्यंत आपापल्या मतदारांचे हित साधण्याचे चीत्र दाखवणारे राजकारण करते. केजरीवालला मात्र हे राजकारण करण्याचा अधिकार दिलेला नाही असे वाटते.

असो , एकाच परिच्छेद लिहिणार होतो , पण शेवटी रायता पसरलाच.

तळटीप : लेखातले विचार वैयक्तिक आहेत , आणि त्याच्याशी सहमत असावे असा लेखकाचा आग्रह नाही .