Monday, May 13, 2013

जीमेल बंद पडले , राज्यात हाहाकार !!


जी-मेल पुन्हा बंद पडले ! भारतात पुन्हा अंध:कार , चारही महानगरांत कामकाज ठप्प !!

न्यूयॉर्क - जगभरातील 'गुगल'च्या युझर्सला आजकाल सकाळ-दुपार-संध्याकाळ "जी-मेल'ला लॉगिन करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 'जी-मेल'ला लॉगिन करताना '502 एरर' दाखवत आहे. ह्या प्रकारामुळे अरबो भारतीय त्रस्त झाले आहेत. बऱ्याच जणांना अन्न गोड लागत नाही, काहींनी जलपान त्याग केले आहे, असे फेसबुक आणि ट्विटर च्या अहवालावरून दिसते. काहींनी रामलीला मैदानावर गुगल विरोधात बेमुदत उपोषण कम आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. कॉंग्रेसचे प्रकुत्ते आय मीन प्रवक्ते डॉगविजय सिंह ह्यांनी ह्या प्रकारामागे RSS चा हात असल्याचे जाहीर पत्रकार सभेत सांगितले. तर अलीकडेच फेम प्राप्त झालेले मनीष तिवारी यांनी आमच्या पत्रकाराला हा प्रश्न विचारल्यावर " तुम कीस मुह से गुगल बंद पडणे की बात करते हो ? तुम्हारा न्यूज च्यानेल तो चालू होके भी बंदके बराबर है." असा उलटा डाव टाकला . अंबिका सोनी यांनी ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होई पर्यंत ह्या मुद्द्याला जास्त हवा देऊ नये असे सांगितले. कपिल सिब्बल यांच्याकडे गुगल मेल बंद बद्दल प्रश्न विचारताच त्यांनी पळ काढला. मायावतींनी गुगल जोवर नोकर्यांत दलितांना ३०% आरक्षण देत नाही तोवर उत्तर प्रदेशात जीमेल बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर मुलायम सिंग यांनी जीमेल बंद पडल्याचे खापर सरकार वर फोडले आहे. बीजेपी ने लोकसभा आणि राज्यसभेत जीमेल-एरर ५०२ चा बुद्द उचलून धरत गोंधळ घातल्यामुळे आज दोन्ही सभागृहे तहकूब करण्यात आली . 
शिवसेनेचे अध्यक्ष मा.उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्राला दिलेल्या २३ पाणी मुलाखती मध्ये "गुगल चे डोके ठिकाणावर आहे काय ? " अशा शब्दांत गुगलवर हल्लाबोल केला आहे. संजय राउत ह्यांनी उद्धवजींच्या ह्या मुलाखतीमुळे गुगलवाल्यांच्या तोंडाला घाम फुटला असल्याचे बोलून दाखवले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुगलच्या मराठी भाषांतर सुविधेबद्दल संतोष व्यक्त करतानाच गुगल बंद पडण्यामागे बिहारी लोकांच्या अमर्याद लोंढ्यांना कारणीभूत ठरवले. शरद पवारांनी येत्या मोसमात मान्सून नंतर जीमेल सुरळीत होण्याचे भाकीत वेधशाळेच्या संदर्भावरून सांगितले. तर त्यांचे सोज्वळ पुतणे म्हणाले की गुगल च्या सर्व्हर्स मध्ये जागेचा अभाव आहे ,तिथे मुतायला देखील जागा नाही. दादांनी असे वक्तव्य करताच त्यांच्या चमच्यांनी त्यांना भरभरून हसून दाद दिली. पण चूक लक्षात आल्याबरोबर दादांनी परत २ मिनिटांचे उपोषण आणि मौनव्रत करून प्रायश्चित्त करून घेतले. आर आर पाटलांनी "बडे बडे सर्व्हर्सपे ऐसी छोटी मोटी घटनाये होती रेहती है" म्हणत प्रश्नाला बगल दिली . 
लालकृष्ण अडवाणींनी जीमेल बंद पडण्याच्या कारणमीमांसा आपल्या ब्लॉगवर स्पष्ट करताना म्हटले आहे की, "भाजप सत्तेवर आल्यास आणि मी प्रधानमंत्री बनल्यास  राममंदिरासोबत जी-मेल सर्व्हरची उभारणी आपण नव्याने करू! " तर मोदींनी सद्भावना उपास करून गुजरातेत जीमेल अखंडित चालू असल्याचा दावा केला. राहुल गांधींच्या मतानुसार जी-मेल सर्व्हर  ह्यांगण्यामागे काहीतरी टेक्निकल कारण असून, त्यांच्या कोड मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचे म्हटले आहे. आपल्याला गुगलने चान्स दिल्यास ते २ मिनिटात जी-मेल सर्व्हर अप करू शकतात असा विश्वास राहुल गांधींना वाटतो. मागे एकदा राहुल गांधींचा लेपटॉप बंद पडलेला तेंव्हा त्यांनी तो तब्बल २ दिवसांत सुरु केला होता. राहुल गांधीनी  MH-CIT ही प्रतिष्ठेची संगणक परीक्षा ६व्या खेपेत पास केली आहे. ममता ब्यानर्जीनी ह्यावर काम्युनिसमचा आरोप लावला आहे. जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मात्र जीमेल ला भारतरत्न देण्यात यावे ही मागणी परत पत्राद्वारे राष्ट्रपतींना कळवली आहे.  
एलबीटी विरोधात आंदोलन करत असलेले अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे सहचिटणीस आबासाहेब कानगोळे यांनी सांगितले की गूगलने जी-मेल बंद ठेवून  आम्हाला  पाठींबा दिलेला आहे.  सदाशिव पेठेतल्या आप्पा कुलकर्ण्यांनी गणपती पाण्यात बुडवून ठेवला आहे  तर त्यांच्या पत्नी सौ. निर्मला कुलकर्णी सारसबागेतल्या गणपतीला अर्धी प्रदक्षिणा घालून बाप्पा कडे साकडे घातले आहे . जी मेल बंद असल्याने कुलकर्णी कुटुंबीय त्यांच्या अमेरिकेत पाओ अल्टो मध्ये याहू! नामक नामांकित कंपनी मध्ये ज्युनियर सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या मुलाशी संपर्क साधता येत नसल्याने त्यांची पुरती अडचण झाली आहे.  आसाराम बाप्पुंनी मेल ची होळी खेळत रेडीफ मेल या एकूण १३ युजर संख्या असलेल्या मेल सर्व्हर वरून १००१ मेल्सचा स्पॅम कम पाउस पाडला. अनिरुद्ध बाप्पुंनी आपल्या भक्तांकडून आजच्या सत्संगात  " ओम गुगलमेल प्राप्ती | जीमेलाय नम: || " ह्या मंत्राचे ५१,००० वेळा नामस्मरण करून घेतले. ढोकळा मोहरी ऐवजी जिर्याची फोडणी देऊन तो शेजवान चटणी सोबत खावा, जीमेल सर्वर वर कृपा होईल , असे निर्मल बाबा म्हणाले .  मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा गुगल ला बसल्या आहेत असे एका महिलेने डोक्यावर २ हांडे पाणी आणता आणता आमच्या पत्रकारास सांगितले.  
दरम्यान रॉयल च्यालेंजरच्या फ्यांसच्या मतानुसार क्रिस गेल च्या धडाकेबाज फलंदाची मुळे जीमेल सर्व्हर गंडल्याचे सांगितले तर पुणे वॉरियरचे चाहते श्रीरंग गोखले म्हणाले की अशोक डिंडाने  बोलिंग रणप घेताना जेंव्हा उडी मारली तेंव्हा तो गुगल सर्व्हर जिथे रन होतो त्या क्लाउडला धडकला आणि जीमेल बंद पडले. तर बहुतांश लोकांचे असे मानने आहे की सर जडेजांनी एक वन लाइनर मेल पाठवल्याने जीमेल बंद पडले आहे, पण सरांविरुद्ध बोलून अवलक्षण ओढावून घेण्याची कोणाची हिम्मत होत नाही.

मनमोहन सिंघ यांनी जीमेल बंद पडल्याबद्दल २ मिनिटे मौन पाळून आपला शोक व्यक्त केला. आणि लवकरच जीमेल सुरळीत करावे असा आदेश CBI ला दिला.

- कॅमेराम्यान आरती छडबडिया सोबत मी टारझन , जंगलन्यूज .

Tuesday, March 5, 2013

*** भारत , भारतीय आणि लोकशाही ***




इंग्रज म्हणायचे , भारतीय लोकं शासन करण्यास नालायक आहेत. पूर्वी मला त्याची खूप चीड यायची. पण आता पटतंय ! स्वातंत्र्य उपभोगण्याची आपली लायकी नाही, भारतीय मानसिकताच गुलामगिरीची आहे. पूर्वी इंग्रज होते, आणि आता दादा , भाई , मामा , तात्या , इत्यादी.  ही लोकं पैसा - पॉवर साठी राजकारणात येणार. जनतेला वाकवणार . जो आडवा येईल त्याला आडवे करणार. आणि निवडणुकीच्या वेळी आपण पुन्हा त्यांनाच निवडून देणार. पक्ष कोणताही असो , पक्षातले पक्षी फक्त गिधाडं . झेंडा बदलला म्हणजे वृत्ती बदलत नाहीत . आणि ह्या उपरही आपल्याकडे लोकशाही ( आणि तीही जगात श्रेष्ठ ) आहे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रत्येक दादा/भाई/नाना/काका चा प्रदेश आहे , जिथे त्याच्याशिवाय कसलीच पानं हलत नाहीत , मोठे आर्थिक व्यवहार होत नाहीत. जागांची हस्तांतरण होत नाहीत . "मला नाही जाणवलं बॉ हे कधी , मी तर किती सुखवस्तू जगतोय " असे म्हणणारे निद्रिस्त गणले जावेत.

राज ठाकरे आत्ता आत्ता पर्यंत थोडे वेगळे वाटायचे. पण आता वाटचाल पाहून थोडं दचकायला होतं, अर्थात इतक्यात अजून काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. माझी सामाजिक बांधिलकी शून्य आहे . मला माझ्याच व्यापातून उरकेनासे झाले आहे , मी काय कोणाला मदत करू. पण जरी माझे उरकून उरत असेल तर मी ते पुढच्या पिढीसाठी ठेवेन , अजून उरले तर त्या पुढच्या .. सो ओंन . ही टिपिकल भारतीय मानसिकता आहे . रोडवर कोणी पडलेला जरी दिसला तरी त्याला थांबून मदत करायला आपल्याकडे ना वेळ  ना इच्छाशक्ती. जास्तीत जास्त शेजारी उभं राहून कसं आणि किती झालंय त्याचा अंदाज बांधत आम्ही उभे मात्र राहू .

जसं मतदान करू लागलो तसा अनुभव एकच आहे , ज्यालाही मतदान करतो तो पडतो. नंतर कळतं दादा / भाइ / डॉन वगैरेच निवडून येतात . दर वेळी येतात . पुन्हापुन्हा येतात . आणि कितीही काहीही घाण केली , उघड उघड राडे केले तरी यांचे काही वाकडे होत नाही. प्रत्येक एरियात हे तिथल्या "तरुणांचे आशास्थान , समाजाचे आधारस्तंभ , धडाडीचे नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते असतात . आमच्या इथे प्राधिकरणात एकदम चकाचक रोड बनले जातात . विमानची धावपट्टी काय असेल एवढे मस्त रोड , पण त्याचा आनंद आम्ही आठवडाभरही घेऊ शकत नाही . कारण रोड खोदण्याचे काम लगेच निघते. सरकारी कामं नाही निघाली तर आमचीच लोकं सटरफटर कामं काढून रोड ला बरोबर आडवा छेद देतात . एक वेळ स्पीडब्रेकर परवडतो पण ते खड्डे नाही . थोडक्यात काय ? पुन्हा कंत्राट काढायला रिकामे. माझ्या घरामागाचा रोड गेल्या ३ महिन्यात ६ वेळा करून झाला आहे , आणि आता पुन्हा कोणीतरी खड्डा पाडला आहे. हे तर एक साधं उदाहरण झालं, अशी चिक्कार उदाहरणं तुम्हालाही माहित आहेत.

जागांचे व्यवहार असोत , कंपनी सुरु करायची असो , किंवा फुटपाथ वर  साधी हातगाडी लावायची असो , लोकल माफिया ( उर्फ दादा/भाई ) किंवा आमदार/खासदार यांचे खिसे भरावेच लागतात. पासपोर्ट काढताय ? व्हेरिफिकेशन साठी पोलीस घरी येत नाहीत , आपल्याला स्तेशनच्या १० चकरा मारायला लागतात , त्यातही चिरीमिरी शिवाय फाईल पुढे सरकत नाही . वरून त्यांची मग्रुरी ऐकून घ्या , नव्हे आपण ती ऐकून घेण्यात धन्य मानतो. आपल्याला चीड येत नाही , आली तरी "हे असंच असतं" म्हणून आपण आपली समजूत घालून घेतो. ह्या उलट जिथे आपली कामं सरळ मार्गाने होत नाही , तिथे आपण सुमडीत पैसे सारून कामे करवून घेतो .  शहर नियोजन नियमानुसार आपल्याला किती जागेवर बांधकाम करण्याची परवानगी आहे, आणि आपण किती करतो ? काही ठिकाणी घराचं फ्लोरिंग थोडं वर असेल तर घरापुढच्या पायऱ्या थेट रोड वर काढतात , तेवढीच फुट दीड फुट जागा मारता येते .  नेत्यांना भ्रष्ट कामाबद्दल शिव्या देत आपण आपल्या अडकलेली काम मागच्या दराने करून घेतच असतो.

बेशिस्त ही भारतीयांच्या रक्तात असते. मला नेहमी ह्या गोष्टीची जास्त चीड येते कारण ही गोष्ट घराबाहेर पडलं की १००% "भोगावी"  लागते. विनाकारण हॉर्न वाजवणे , सिग्नल हा रोडवर मनोरंजक लाईट शो असल्यासारखे ट्रीट करणे , ८ तासांच्या ड्युटी मध्ये ४ तास टाईमपास करणे आणि तरीही वाढीव पगाराची अपेक्षा करणे , असंख्य गोष्टी आहेत . आम्ही जर्मन कार वापरतो , पण ती चालवताना जर्मन शिस्त आमच्या अंगी येत नाही . आमच्याच वाढदिवसाचे हार्दिक अभिनंदन आम्ही चौकाचैकात करून स्वत:चेच कुल्ले बडवून घेतो.  शुभेच्चुकांना जर एवढाच वाढदिवसाचा पुळका आला असेल तर ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन त्याला मिठ्या मारा , केक कापा किंवा अजून काही करा , चौकात घाण करण्याचे कारण समजत नाही . बरं यांना बघून गार वाटतं असही नाही. रेड्यासारखे राकट चेहरे , मैदा फुगाल्यासारखे शरीर अंगावर सरळ(?) मार्गाने किंवा कष्टाने(?) मिळवलेलं सोनं आणि खाली  काडी पैलवानांची पंगत  ह्यांचे पोस्टर हेच पन्नास वेळा बघतात.

राजकारणाचा आणि समाजकारणाचा तिळमात्र संबंध राहिलेला नाही.  समाजकारण करणारास मूर्ख समजले जाते. ह्याचा अर्थ समाजकारण करणारे शून्य आहेत असे नाहीत. ते त्यांचं कार्य वर्षानुवर्षे विना कोणत्या चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावल्याविना करत आहेत . बाबा आमटेचे  वाढदिवसाचे अभिनंदन करणारा फ्लेस्क एकही नाही. न्यूज च्यानेल वर त्यांना शुभेच्छा देणारी जाहिरातही कोणी देत नाही . किंवा ते स्वत: देखील त्यांचे वाढदिवस १००-१०० केक कापून किंवा जंगी दारू-मटणाच्या पार्ट्या देऊन साजरे करत नाहीत.  बाबा आमटे करोडोमध्ये एकच .. दादा / मामा / भाई मात्र चौकाचौकात २०-१ असे सापडतात.

नाना पाटेकर म्हणतो ते खरेच, भारताची जी प्रांतवार रचना झाली तीच मुळात चुकीची आहे. देशात आम्ही प्रांतवार भांडतो . राष्ट्रात आम्ही गाववाले आणि उपरे म्हणून भांडतो. तर समाजात जातीधर्मावर भेदभाव आहेच . थोडक्यात "भारतीय" वगैरे अस्म काही नसतं , असतं ते "मी" आणि "माझे".  व्हिसा घेऊन कल्टी मारायची आणि तिकडे जाऊन भारतप्रेम जागे करायचे . आपण अतिसर्वसामान्य आहोत. जगाला शून्य दिला म्हणून लाल करतो अरे पण त्यानंतर तुम्ही केवळ शून्यात आहात. तुमच्या चुका तुम्हाला दाखवल्या की राग येतो.  माझ्या भारतावर माझे भरपूर जीवापाड वगैरे प्रेम आहे असे म्हणणारे माझ्या आजूबाजूला खूप आहेत. त्यांना आपल्या भारताविषयी ( किंवा भारतीय बाण्याविषयी ) छेदल्यास खूप राग येतो . पण तो राग फुसका असतो ,त्या रागाला काही मजबूत बेस नाही. बाहेरच्या देशात काय चांगलं आहे हे त्यांना सांगितल्यास ते मला त्या देशातले नकारात्मक गुण ऐकवतात. पण "आपण आपली ग्रोथ करून घेण्यासाठी दुसरीकडून चांगलं का उचलू नये ?  " ह्या प्रश्नांचे उत्तर मला अद्याप भेटलेले नाही .

असो , फार फ्रस्ट्रेषण काढलं . भारत, भारतीय आणि लोकशाही  आहे ही अशी आहे , ती भविष्यात  बदलेल ह्याची चिन्ह नाहीत आणि इच्छाशक्ती अत्यंत कमजोर आहे. मान्य करा / करू नका ( काय फरक पडतो ? )


- टारझन


Thursday, January 3, 2013

सोशल सेन्स


( सगळे विचार वैयक्तिक आहेत , त्याच्याशी कोणीही सहमत असले पाहिजे असा  आमचा काही आग्रह नाही. )

" टाऱ्या साल्या तुला काही सोशल सेन्स नाही . अरे एवढा क्रूर ग्यांगरेप झाला दिल्लीत .. एक मुलगी जिवानिशी गेली. अरे तिच्या कहाण्या सांगणाऱ्या स्टेटसेस णे बघ कश्या भिंती च्या भिंती भरल्या आणि कोरड्या भिंतींनाही रडू आवरेनासे झाले. प्रत्येकजण हळहळला आहे . तुला रे कसं काही वाटत नाही ? एवढा निर्दयी ?   "  तो अखंडित पणे माझ्यावर माझ्या संवेदनहीनतेचे आरोप करत होता. त्याला कारणही तसेच होते . त्याने टाकलेल्या  एका भावनिक स्टेटस वर मी  " ह्या दु:खात आपण किती दिवस जेवण सोडलंत"  म्हणून एक नेहमीप्रमाणे कुत्सित कमेंट टाकून आलो होतो . तो दुखावला होता. त्याच्या सोशल अवेयरनेस वर असा " पब्लिक " वार तो खाऊ शकत नव्हता. 
असे बरेच जन मला फेसबुक वर दिसतात . हल्ली फेसबुक म्हणजे भावनांना मोकळीक देण्याचं फुकाचं आणि सिम्पली उपलब्ध असणारं साधन. अर्थात इथे भावनाच काय बाकी गोष्टीही शेयर होतात . त्याला आमची ना नाही . आम्ही पण कळत नकळत शोबाजी करतोच. पण अतिरंजित , ओव्हरएक्टिंग , आणि मनापासून नसलेली पण बळेच आव आणून दाखवलेली कळकळ किंवा मळमळ पहिली की हसायला येतं .

काय असतो हा सोशल सेन्स ?
सोशल सेन्स म्हणजे आपल्या आजूबाजूला जे चालू आहे त्याला जास्तीत जास्त प्रखरपणे आणि उत्स्पुर्फ पणे भावना प्रकट करने.  बॉम्बस्फोट झाला , रेप झाला , कुठे घोटाळा झाला , कुठे फोलीस लाच खाताना सापडला , कुठे कोणता मंत्री कोणत्या स्केंडल मध्ये अडकला , किंवा कुठे काहीही झालं आणि आपल्या मिडीयाने तो  विषय तापवला की फेसबुक ( होय , आजचा सोशल कट्टा फक्त फेसबुक आहे ) वर आपले भारीतले स्टेटस आले पाहिजेत किंवा आपली लिहिण्याची कुवत नसेल तर दुसऱ्याचे टेपुन ( किंवा सभ्यता असेल तर ) शेयर करून आपली त्या विषयातली कळकळ अत्यंत वैयक्तिक पणे दाखवणे म्हणजे सोशल सेन्स.

हल्लीचाच विषय घ्यायचा झाला तर , दिल्ली सामुहिक बलात्कार. ह्या विषयावर एकाने मला विचारले. तू बाकी वेळ लै स्टेटसच्या जिलेब्या टाकतो , ह्या विषयावर कसं काही नाही ? तुला कसं काही वाटत नाही? किंवा तुला ही गोष्ट कॅजूअल वाटते की तिच्यावर कमेंट करणंही जरुरी वाटत नाही ? अर्थात ह्याला उत्तर हो आणि नाहीही.  नाही ह्या साठी की, जे झालं ते वाईट झालं. त्या मुलीसाठी वाईट वाटणे साहजिक आहे . आणि  हो ह्यासाठी की ही खरोखर कॅजूअल गोष्ट आहे कारण ह्या घटनेपेक्षा निर्घृण घटना मी फार पूर्वीपासून ऐकत आलो आहे. हल्ली मिडियाकडे दुसरा विषय नसल्याने ४-५ सांडोऱ्या-गंडोऱ्यांना तिथे चर्चेला बोलावून गुऱ्हाळ चालवतात. वातावरण एकदम ग्यांगरेपमय करून टाकले आहे. प्रश्न असा आहे की जर मीडियात हा विषय इतका पेटला नसता तर एवढे सगळे कळवळ करणारे जागे झाले असते का ? इंडियागेटवर मोठा हंगामा झाला.  तिकडे पार पोलीस वगैरे बोलवावी लागली . तरुण पिढी जागी झाली , समाज जागा झाला ह्या मथळ्याच्या बातम्या न्यूजवाल्यांनी टाकल्यामुळे आजूबाजूचे युवक युवती जागे झाले ,२ चालले म्हणून ५ जन अजून गेले , तेवढंच न्यूज च्यानेल वर आलो तर एयर टाईम मिळेल ह्या भावनेने गेलेले नमुने आपल्याकडे खूप !  अर्थात बरेच जन खऱ्या आसेपोटी गेलेही  असतील. पण बाकीचे  तिकडे जाऊन तिथे फोटो क्लिक करतात आणि आपला सोशल सेन्स फेसबुक वर अगदी टयाग करून शेयर वगैरे करतात तेंव्हा तो ढोंगीपणा आपलाला काही रुचत नाही बुवा. त्यापेक्षा आपलं मौन बरं .

हल्ली झालेली घटना वाईट, निंदनीय  इत्यादी नक्कीच आहे , पण त्यावर कमेंट न करणं म्हणजे सोशल सेन्स नसनं कसं?  किंवा त्यावर मस्त मजा घेऊन चर्चा करणं ह्यात कसला आलाय सोशल सेन्स ? न्यूज च्यानेल बघणेही आता इरिटेट होते. जिकडे बघावं तिकडे तो विषय. कोर्ट आपले काम करेल, अपराधी लोकं गजाआड जातील विषय मिटेल. परत नवीन बलात्कार होतील. मी लेख लिहेपर्यंत झालेही असतील. ते व्हावेत असं मला वाटत नाही. पण "आपल्या सोशल सेन्स"  मुळे असे प्रकार बंद होतील असे समजणे हास्यास्पद आहे. माझ्या आजूबाजूला कुठे छेडछाड दिसली की मी मोक्याच्या ठिकाणी नक्की मध्ये पडतो. त्यानिमित्ताने मलाही हात मोकळे करायला वाव मिळतात हा दुय्यम फायदा.

मजा तेंव्हा आली जेंव्हा हा सोशल सेन्स जागे असलेले लोकं  भरभरून दर्दभरे स्टेटस लिहितात . दु:ख व्यक्त करतात ,हळहळतात  आणि नेमकं एक जानेवारीला त्यांचे पार्टी करतानाचे फोटो येतात. रात्री ११:५५ वाजता स्टेटस पडतो ,   " एन्जॉईंग न्यू इयर इव्ह  with आमकी , टमकी , ढमक्या & ४ ऑदर्स @ धिंगाणा लाउंज ."  मी आधी बुचकळ्यात पडायचो अरे  , मागे कुठे त्सुनामी की वादळ आलं तेंव्हाही हा खूप दु:खी होता. आपण त्या लोकांचे फेसबुक वर सांत्वन करून त्यांना मानसिक पाठिंबा देण्याविषयी बोलत होता. त्या दु:खाचा ह्यांगओव्हर काढण्यासाठी मग गोव्याला ४ दिवस वैचारिक आराम करून आला होता .

असो जो जे वांछील तो ते लाहो .  सांगणे फक्त एकच ,  आपल्या घरात जर अशा अप्रिय घटना घडल्यातर आपण त्याचे स्टेटस फेसबुक वर टाकूत काय ? त्याच्या चर्चा तेवढ्याच पानभर प्रतिक्रिया देऊन करू काय ? त्यावर पोल-पोल खेळू काय ? असली -नकली फोटो शेयर करूत काय ?

Monday, February 6, 2012

Random - what to title it ?

Somebody has said it very nicely , "Memories are very fascinating, they make you cry when you had laughter and make you laugh when you cried for stupid things in past ".  I don't know what happened today which triggered this "sensitive"nerve of mine . I was listening to old hindi songs as usual and things started to make traffic jam in my mind .

Memories have no sequence, they have offsets. I didn't have great glorious life like price Charles  in past but certainly I am happy with whatever I have lived and I have enough to cherish for . Time is amazing thing, I wish I could play with it and go to the past and relive those moments. I don't want to change anything ( even if I did terrible mistakes ) its just perfect at that moment. An adrenaline pass through the blood and it takes me higher .

I remembered the days of engineering admission process. I was on my own. How I felt the form , how I went through the admission process and the first day of college . New guys new girls new campus . I never knew whats next at that point of time . The first semester ended before I could realize anything. I was 4 down. Another semester went and a year went down ;) I got new computer and I was so crazy after it and use to play games for 8-12 hrs without a sip of water. It wasn't like I enjoyed my year down but I was crazy in computer games. Engineering Mathematics I , II, II , engineering mechanics  were like biggest evils those days, I never liked  Maths. I hardly attended  the lectures in college. Neither I went to any coaching classes. I never filled rechecking and re-valuation forms ever in engineering . Though surprisingly I cleared this big obstacle I never had downs again. That makes me remember how I studied and cleared my engineering. Whole semesters I hardly cared for attending lectures and when PLs started it use to take a week to start studies. When things were upto the neck Surprisingly /automatically I studied for 15 Hrs and managed to score good . PLs are the best part of engineering. 40 theories , 16 practicals , 12 vivas. Same zeal , same thrill . The best part is the roamers about result declarations. someone use to spread about result dates which mostly use to be False and one day result really comes out . The anxious level on that day is sky high. I loved that .

I remember when I got my first job. First job is top highlighted thing in anyone's life. We all have some memories attached with it. I use to show off my access/id card while going to office. I still laugh I did that stupid thing . Just hold the access card on the door and door opens for you , yeah great feeling of that time . All AC office , you gonna work in front of PC whole day and you are going to be paid for same . Soon you realize the reality. Your mind pumps many things but your heart deny to accept. One day Mind wins.. I remember how I got Visa , how I was sent onsite alone. I remember my first flight experience. I remember the feeling of first emigration. I remember the look of that emigration officer gave at me . I remember the smile of air hostess. The never ending lonely days in Africa and the feeling of coming back home after Months , It felt like ages . Changing job becomes habitual and you don't feel it anymore . It becomes the part of life . You don't show off your ID card anymore. You are not proud of yourself for being a software engineer in fact "Some times "you feel pity for yourself.  Someday when you have big party and you are enjoying your unlimited multi-choice
cuisine , you remember how you use to manage "egg biryani" in your college days and laugh within yourself.

We were free birds. Clock didn't decide if its a day or night . Sleep for long days. Game for nights. Take your bike and go on unplanned trips. Friends were the world. I feel for some people, I wish they never go away from me. For some I don't care, I don't even try to remember them. Some people live impact on you. Some people teach you that don't become like them. I remember the girls I had crush on. I remember time had with Bappya, vaghya , pady , yogya and nilya . Pady use to imagine some stupid thoughts and I use to expand it , it was our daily program for years. Bappya's BJ hostel was another holiday resort for some time. Going to Pune station @ 2AM and having tea and pattis was lovely thing.

So many things gathered in mind but hardly some came on the white paper. I dunno what I skipped and what I put . But Its amazing. We are blessed with the most awesome thing called human brain.
Its not like I am old fellow who is about to retire from his career. I don't think I need that criteria to write about my life :) my memories are mine , will remain mine forever. This can be a poor attempt to cherish them but I love it .