णमर्स्कार्स फोक्स ,
"अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो-विडियो अल्बम येत असतील तर .. तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? )
प्रत्येकाला बर्याचदा असं वाटत असावं , हा काळ जर इथेच थांबवता आला तर ? ही वेळ सरु च नये ! अर्थात ह्या आपल्या सुखी काळातल्या इच्छा असतात. उगाच जोराची लागलीये आणि कधी ऑफिसात किंवा घरी जाऊन मोकळा होतोय त्या वेळी " हा काळ असात अनंत युगे निरंतन चालत रहावा , मी ह्याच अवस्थेत ह्या पायावरुन त्या पायावर भार देत , कपाळाचा घाम पुसत , इकडे तिकडे बघत कधी कधी इच्छा नसताना स्माईल करत उभा रहावं " असं निश्चित कोणाला वाटणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा , आपल्या आयुष्यात बर्याचदा चांगल्या गोष्टी घडतात. आपण त्या वेळी खुप आनंदात असतो. पण तो आनंद असा त्या ठिकाणी गोठुन रहात नाही. आपण ते क्षण कैद करतो ते आपल्या कॅमेर्यात. आता तर मोबाईल मधे ही कॅमेरे आल्याने त्याचं एवढं महत्व राहिलेलं नाहीये .
पण हे असं नव्हतं . पुर्वीच्या काळी , जास्त लांब कशाला जाता , दहाएक वर्षांपुर्वीच पब्लिक फोटो स्टुडियो मधे जाऊन फोटो काढायचे. फोटो स्टुडियो म्हंटलं की लगेच बायकांची त्यांची सर्वांत स्पेषल साडी घालनं , फेयर अँड लव्हली , लिप्सस्टिक , नथनी , इयर रिंग्ज ( भल्या त्या दिसेनात का त्या फोटोत ) ,एटुझेड ज्वेलरी , बांगड्यांपासुन चपलांपर्यंत , सगळी जैय्यत तयारी असायची. पुरुष वर्ग तेवढा उत्साही नसावा हे मला आमचा अल्बम पाहिल्यावर कळते. असेल तोच ड्युटीवर जायचा ड्रेस , त्याकाळी आलेली बेल बॉटम फॅशन ची पँट, हेयरस्टाईल वगैरे म्हणजे काय ? सगळ्यांची एकाच मोल्ड मधुन काढलेली केशभुषा, लहान पोरं असतील तर त्यांना डोळे भर फासलेलं काजळ , हातात त्या काळ्या-पांढर्या बांगड्या ( बांगड्याच असतात का हो त्या ? आठवत नाही ) , नजर लागु नये म्हणुन चार ठिकाणी लावलेलं काजळ , शर्ट बर्याचदा असतो , पण खाली चड्डी / पँट असेल की नाही ह्याची काही गॅरेंटी नाही. आज्जी -अजोबा किंवा सिनियर सिटिझन असतील तर मग आज्जी च्या कपाळावर भलं मोठं कुंकु , आजोबांना पगडी किंवा फेटा , हातात छडी हवीच , बांडीस , धोतर आणि असे ऐटित बसुन मग ते फोटो काढणार . कमी बजेट असलेल्या फॅमिली एकाच फ्रेम मधे कोंबुन कोंबुन बसवल्या जायच्या.
बर्याचदा माझा वेळ जात नसला की मी आमचा अल्बम उघडुन बघतो. त्यात सगळे नातेवाईक असे एका ठिकाणी असतात. तसे नातेवाईक घरी आले की माझ्या कपाळावर आठ्या पडतात हे प्रांजळपणे नमुद करतो. त्याला तसं कारणंही आहे म्हणा. मी जास्त कोण्या नातेवाईकाकडे एक तर कधी राहिलो नाही , आणि बरेच दिवस ये जा नसल्याने त्यांच्या विषयी म्हणावा तसा भावनिक जिव्हाळाही नाही. पण अल्बम मधले ते मला आवडतात . अल्बमचं स्वरुपही काळाच्या ओघात खुपसं बदललेलं आहे. एका पानावर एक फोटु बसणारे , एका पानावर दोन फोटु बसणारे ,प्लास्टिक कोट मधे फोटो ठेवायचे बुकलेट सारखे अल्बम मागे पडलेत आता तर मोठे मोठे .. स्पायरल वाईंडिंग असणारे अल्बम आलेत. संगणक युगात तर आता त्याचीही गरज नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. ऑनलाईन अल्बम पर्यंत येउन पोचलोय . माध्यमं बदलली तरी भावना त्याच राहिल्यात.
बी.आर. चोप्राच्या महाभारतात अँकरिंग करणारा तो " मै समय हुं " , स्वत:चीच लाल करत स्वतःच्याच हजारो डेफिनिशन्स देतो तेंव्हा मला मोठी मौज वाटे . "मै समय हुं .. मै अनंत हु .. अनादी हु .. युगे युगे चलने वाला मै .. ना भगवान श्रीक्रिष्ण के लिये रुका ना पांडवों के लीये , ...." ( असो विषयांतर नको ) वेळ कधीच थांबत नसतो . पण अल्बम ती वेळ आपल्याला पुन्हा पुन्हा जगायचं एक माध्यम आहे. अल्बम कितीही वेळा पहा कधी बोर होत नाही . अल्बम कधीच जुणा होत नसतो , त्याला तर वयंच नसतं म्हणा. उलट अल्बम जेवढा जुणा होतो तितका त्याला पाहिले असता आपल्याला जास्त आनंद भेटतो. आपण लहाणपणी कसे दिसायचो ? हे आपल्याला डोळे मिटल्यावर आठवणार आहे काय ? अल्बम बघा, त्या फोटो बरोबर अजुनही बरंचसं काही आठवेल . अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात. प्रत्येक फोटो बरोबर काही ना काही गोष्ट नक्कीच जुळलेली असते. फॅमिली सोबत अल्बम घेऊन बसलं की बघा २ - ४ तास कसे निघुन जातात . पाहुणे घरी आले की मी हटकुन अल्बम काढायचो . दुपारी महिलावर्ग कामं आटोपुन झोपायच्या तयारीत असायचा. पण मी अल्बम काढला की त्यांच्या झोपा कूठल्या कुठे उडुन जात . आणि संपुर्ण दुपार गप्पा टप्पा , जुण्या आठवणी , त्यांचे अनंत किस्से , कोण कोणाला काय म्हणालं होतं , मग त्याचं कसं झालं होतं , पासुन ते फोटो काढण्या आधी आपण काय केलं नी काय नाही पासुन सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा पुणरावृत्ती होते आणि त्याची कोणालाही हरकत नसते , कारण सर्वांना ते हवंच असतं .
अल्बम मधले सर्वात जास्त प्रिय असतात ते स्वतः चे फोटो. तेंव्हा मी कसा होतो ? तेंव्हा माझ्या डोक्यावर केस होते , कसे धारदार डोळे होते इत्यादी विचार बुढौंच्या मनात येतात , तर कधी काळी मी देखील यौवनात होते असं आजीबाईंना वाटत असणार. तोच एखादा नागवा फोटु दाखवुन सगळे जण आमच्यासारख्यांवर हसुनही घेतात. पण त्यावेळी तात्पुरतं खजिल व्हायचं असतं
हो ! एक गोष्ट नक्की , अल्बम हा "स्वत:चा" असेल तरंच प्रिय असतो. दुसर्याचा अल्बम म्हणजे कहर असतो . अगदी पुलंच्या शत्रुपक्षाची आठवण व्हावी इतका .
मी कधी एकटा असलो की नेहमी अल्बम चाळतो . एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघतो . आणि आठवणींत रमुन जातो. आता ते प्लास्टिक बुकलेट्स चे अल्बम बघायची गरज नाही. स्कॅन करुन लॅपटॉप वरंच उपलब्ध असल्याने ते हवे तिथे बघता येतात. मजा येते. काल रात्रीच अल्बम चाळता चाळता लेख लिहीणार होतो पण डोळा कधी लागला ते कळलंच नाही .
जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल .
"अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो-विडियो अल्बम येत असतील तर .. तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? )
प्रत्येकाला बर्याचदा असं वाटत असावं , हा काळ जर इथेच थांबवता आला तर ? ही वेळ सरु च नये ! अर्थात ह्या आपल्या सुखी काळातल्या इच्छा असतात. उगाच जोराची लागलीये आणि कधी ऑफिसात किंवा घरी जाऊन मोकळा होतोय त्या वेळी " हा काळ असात अनंत युगे निरंतन चालत रहावा , मी ह्याच अवस्थेत ह्या पायावरुन त्या पायावर भार देत , कपाळाचा घाम पुसत , इकडे तिकडे बघत कधी कधी इच्छा नसताना स्माईल करत उभा रहावं " असं निश्चित कोणाला वाटणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा , आपल्या आयुष्यात बर्याचदा चांगल्या गोष्टी घडतात. आपण त्या वेळी खुप आनंदात असतो. पण तो आनंद असा त्या ठिकाणी गोठुन रहात नाही. आपण ते क्षण कैद करतो ते आपल्या कॅमेर्यात. आता तर मोबाईल मधे ही कॅमेरे आल्याने त्याचं एवढं महत्व राहिलेलं नाहीये .
पण हे असं नव्हतं . पुर्वीच्या काळी , जास्त लांब कशाला जाता , दहाएक वर्षांपुर्वीच पब्लिक फोटो स्टुडियो मधे जाऊन फोटो काढायचे. फोटो स्टुडियो म्हंटलं की लगेच बायकांची त्यांची सर्वांत स्पेषल साडी घालनं , फेयर अँड लव्हली , लिप्सस्टिक , नथनी , इयर रिंग्ज ( भल्या त्या दिसेनात का त्या फोटोत ) ,एटुझेड ज्वेलरी , बांगड्यांपासुन चपलांपर्यंत , सगळी जैय्यत तयारी असायची. पुरुष वर्ग तेवढा उत्साही नसावा हे मला आमचा अल्बम पाहिल्यावर कळते. असेल तोच ड्युटीवर जायचा ड्रेस , त्याकाळी आलेली बेल बॉटम फॅशन ची पँट, हेयरस्टाईल वगैरे म्हणजे काय ? सगळ्यांची एकाच मोल्ड मधुन काढलेली केशभुषा, लहान पोरं असतील तर त्यांना डोळे भर फासलेलं काजळ , हातात त्या काळ्या-पांढर्या बांगड्या ( बांगड्याच असतात का हो त्या ? आठवत नाही ) , नजर लागु नये म्हणुन चार ठिकाणी लावलेलं काजळ , शर्ट बर्याचदा असतो , पण खाली चड्डी / पँट असेल की नाही ह्याची काही गॅरेंटी नाही. आज्जी -अजोबा किंवा सिनियर सिटिझन असतील तर मग आज्जी च्या कपाळावर भलं मोठं कुंकु , आजोबांना पगडी किंवा फेटा , हातात छडी हवीच , बांडीस , धोतर आणि असे ऐटित बसुन मग ते फोटो काढणार . कमी बजेट असलेल्या फॅमिली एकाच फ्रेम मधे कोंबुन कोंबुन बसवल्या जायच्या.
बर्याचदा माझा वेळ जात नसला की मी आमचा अल्बम उघडुन बघतो. त्यात सगळे नातेवाईक असे एका ठिकाणी असतात. तसे नातेवाईक घरी आले की माझ्या कपाळावर आठ्या पडतात हे प्रांजळपणे नमुद करतो. त्याला तसं कारणंही आहे म्हणा. मी जास्त कोण्या नातेवाईकाकडे एक तर कधी राहिलो नाही , आणि बरेच दिवस ये जा नसल्याने त्यांच्या विषयी म्हणावा तसा भावनिक जिव्हाळाही नाही. पण अल्बम मधले ते मला आवडतात . अल्बमचं स्वरुपही काळाच्या ओघात खुपसं बदललेलं आहे. एका पानावर एक फोटु बसणारे , एका पानावर दोन फोटु बसणारे ,प्लास्टिक कोट मधे फोटो ठेवायचे बुकलेट सारखे अल्बम मागे पडलेत आता तर मोठे मोठे .. स्पायरल वाईंडिंग असणारे अल्बम आलेत. संगणक युगात तर आता त्याचीही गरज नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. ऑनलाईन अल्बम पर्यंत येउन पोचलोय . माध्यमं बदलली तरी भावना त्याच राहिल्यात.
बी.आर. चोप्राच्या महाभारतात अँकरिंग करणारा तो " मै समय हुं " , स्वत:चीच लाल करत स्वतःच्याच हजारो डेफिनिशन्स देतो तेंव्हा मला मोठी मौज वाटे . "मै समय हुं .. मै अनंत हु .. अनादी हु .. युगे युगे चलने वाला मै .. ना भगवान श्रीक्रिष्ण के लिये रुका ना पांडवों के लीये , ...." ( असो विषयांतर नको ) वेळ कधीच थांबत नसतो . पण अल्बम ती वेळ आपल्याला पुन्हा पुन्हा जगायचं एक माध्यम आहे. अल्बम कितीही वेळा पहा कधी बोर होत नाही . अल्बम कधीच जुणा होत नसतो , त्याला तर वयंच नसतं म्हणा. उलट अल्बम जेवढा जुणा होतो तितका त्याला पाहिले असता आपल्याला जास्त आनंद भेटतो. आपण लहाणपणी कसे दिसायचो ? हे आपल्याला डोळे मिटल्यावर आठवणार आहे काय ? अल्बम बघा, त्या फोटो बरोबर अजुनही बरंचसं काही आठवेल . अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात. प्रत्येक फोटो बरोबर काही ना काही गोष्ट नक्कीच जुळलेली असते. फॅमिली सोबत अल्बम घेऊन बसलं की बघा २ - ४ तास कसे निघुन जातात . पाहुणे घरी आले की मी हटकुन अल्बम काढायचो . दुपारी महिलावर्ग कामं आटोपुन झोपायच्या तयारीत असायचा. पण मी अल्बम काढला की त्यांच्या झोपा कूठल्या कुठे उडुन जात . आणि संपुर्ण दुपार गप्पा टप्पा , जुण्या आठवणी , त्यांचे अनंत किस्से , कोण कोणाला काय म्हणालं होतं , मग त्याचं कसं झालं होतं , पासुन ते फोटो काढण्या आधी आपण काय केलं नी काय नाही पासुन सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा पुणरावृत्ती होते आणि त्याची कोणालाही हरकत नसते , कारण सर्वांना ते हवंच असतं .
अल्बम मधले सर्वात जास्त प्रिय असतात ते स्वतः चे फोटो. तेंव्हा मी कसा होतो ? तेंव्हा माझ्या डोक्यावर केस होते , कसे धारदार डोळे होते इत्यादी विचार बुढौंच्या मनात येतात , तर कधी काळी मी देखील यौवनात होते असं आजीबाईंना वाटत असणार. तोच एखादा नागवा फोटु दाखवुन सगळे जण आमच्यासारख्यांवर हसुनही घेतात. पण त्यावेळी तात्पुरतं खजिल व्हायचं असतं


मी कधी एकटा असलो की नेहमी अल्बम चाळतो . एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघतो . आणि आठवणींत रमुन जातो. आता ते प्लास्टिक बुकलेट्स चे अल्बम बघायची गरज नाही. स्कॅन करुन लॅपटॉप वरंच उपलब्ध असल्याने ते हवे तिथे बघता येतात. मजा येते. काल रात्रीच अल्बम चाळता चाळता लेख लिहीणार होतो पण डोळा कधी लागला ते कळलंच नाही .
जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल .